डॉ. तनपुरे कारखाना कामगार युनियनच्या चौकशीचे आदेश

  49

राहुरी : डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना, श्रीशिवाजीनगर येथील राष्ट्रीय साखर कामगार युनियनच्या गैर कारभाराची चौकशी करून यूनियन चे कार्यकारी मंडळ बरखास्त करण्यात यावे अशी मागणी राहुरी फॅक्टरी येथील साखर कामगार एकीकरण समितीच्या वतीने चंद्रकांत कराळे, इंद्रभान पेरणे, रफिक सय्यद, प्रहार चे आप्पासाहेब ढूस आदींनी केली होती.


या मागणीनुसार नाशिक येथील कामगार उपायुक्तांनी श्रमिक संघ अधिनियम १९२६ मधील तरतुदीनुसार युनियनला कारणे दाखवा नोटीस बजावली असून सात दिवसात उत्तर दिले नाही तर युनियनचे कार्यकारी मंडळ बरखास्त करण्यात येईल असे आदेश दिल्याने कारखाना कार्यक्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या राष्ट्रीय साखर कामगार युनियन च्या मार्फत सदर साखर कारखान्याचे कोणत्याही प्रकारचे प्रश्न सोडविले जात नाही कामगार हिताचे निर्णय
घेत नाही.



तसेच कामगार युनियन ॲक्ट १९२६ मध्ये दिलेल्या नियमानुसार अस्तित्वात असलेली युनियन ही घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करित असून कोणतेही व्यवहार नियमाप्रमाणे करत नाही. त्याचप्रमाणे नियमानुसार असलेली २००१ ते २००५ कालावधी करिताची युनियन बरखास्त दाखवून बेकायदेशीरपणे नवीन सदस्य निवड दाखवून युनियनचा ताबा घेण्यात
आलेला आहे.


हे सर्व कामकाज बेकायदेशीर असल्यामुळे कामगार एकीकरण समिती मार्फत दीड महिन्या पूर्वी बेकायदेशीर असलेल्या युनियनवर कायदेशीर कार्यवाही करून तिला बरखास्त करण्यात यावी. सदर तक्रारीची गंभीर दखल घेत अस्तित्वात असलेला युनियनच्या गैरव्यवहार व गैरकारभार पहाता त्यांना चौकशीची नोटीस देऊन कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.


साखर कामगार एकीकरण समिती मार्फत चौकशीअंती युनियनकडून गैरकारभाराच्या संपूर्ण रकमा वसूल करण्याची मागणी लावून धरली जाणार असल्याचे साखर कामगार एकीकरण समितीचे प्रमुख चंद्रकांत कराळे, रफिक भाई सय्यद, व इंद्रभान पेरणे, आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले त्यामुळे कामगारांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Comments
Add Comment

स्ट्रॉबेरी पिकाचा पीक विमा योजनेत समावेश

कळवण : कळवण तालुक्यातील पश्चिम पट्टा आणि सुरगाणा तालुक्यातील घाटमाथा तसेच गुजरात सीमेलगतच्या सापुतारा

'मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेसने माफी मागावी'

मालेगाव : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका

केळीच्या बागांत राहणाऱ्या वाघांना ओळख देण्यात वनविभागाचे अपयश

अनेर - मेळघाट काॅरीडॉर प्रकल्प प्रलंबितच… विजय पाठक जळगाव : जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने वन्यजीव संरक्षण

नाशिक मनपा घेणार आणखी तीनशे कोटींचे कर्ज

महापालिका आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका तयारीला

इगतपुरीतील तीनलकडी पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य; नागरिक त्रस्त

इगतपुरी : इगतपुरी शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील तीनलकडी पुलाची दुरवस्था झाली असून, या पुलावर मोठ्या

दहिवडमध्ये बिबट्या जेरबंद

नागरिकांमध्ये भीती कायम; आणखी पिंजऱ्यांची मागणी देवळा : देवळा तालुक्यातील दहिवड येथील लवखाड मळ्यामध्ये अनेक