Railway Employees promotion : रेल्वेच्या पदोन्नती प्रक्रियेत घोळ!

रेल्वे युनियनचा पदोन्नती प्रक्रियेत पक्षपाताचा आरोप; रेल्वेमंत्र्यांकडे केली चौकशीची मागणी


नवी दिल्ली : भारतीय रेल्वे सिग्नल आणि दूरसंचार अनुरक्षक संघाने (IRSTMU) आरोप केला आहे की रेल्वेमध्ये पदोन्नतीसोबत अनिवार्य स्थानांतरण केले जाते (Railway Employees promotion) आणि त्यात मोठ्या प्रमाणावर पक्षपात होत आहे. संघटनेने २७ फेब्रुवारीला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांना पत्र लिहून सदर गैरप्रकार निदर्शनास आणला असून रिक्त पदांसाठी कर्मचाऱ्यांना त्यांची प्राथमिकता (railway promotion process) निवडण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.


IRSTMU चे महासचिव आलोक चंद्र प्रकाश यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, रेल्वेमध्ये पदोन्नतीसाठी स्पष्ट नियम असले तरी अनेक कर्मचारी पदोन्नती घेण्यास नकार देतात, कारण त्यांना दूरवरच्या किंवा नापसंतीच्या ठिकाणी स्थानांतरित केले जाईल याची भीती असते.



त्यांनी आरोप केला की, केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निकटवर्तीय असलेल्यांनाच इच्छित ठिकाणी नियुक्ती मिळते, तर उर्वरित कर्मचाऱ्यांना दूरच्या ठिकाणी पाठवले जाते. यामुळे त्यांचे कौटुंबिक जीवन विस्कळीत होते आणि अनेक वेळा उद्ध्वस्त होते.


संघटनेचे मत आहे की, या प्रकारच्या नियुक्त्यांमुळे कर्मचारी मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करतात, ज्यामुळे ते पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाहीत आणि कामात अनास्था दाखवतात.



रेल्वे युनियनची रेल्वेमंत्र्यांना सुधारणा करण्याची विनंती


संघटनेने मंत्री वैष्णव यांच्याकडे मागणी केली की, पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना रिक्त पदांची माहिती देण्यात यावी आणि त्यांना स्वतःची प्राधान्यस्थाने सांगण्याची संधी द्यावी.


प्रकाश यांच्या मते, या निर्णयामुळे केवळ पदोन्नती आणि स्थानांतरण प्रक्रियेत पारदर्शकता येईल असे नाही, तर कामाची गुणवत्ता आणि कर्मचार्‍यांच्या कामावरील आदरातही वाढ होईल.


ते पुढे म्हणाले की, रेल्वेमंत्री रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सतत कार्यरत आहेत आणि आम्हाला आशा आहे की ते या मुद्द्याची सकारात्मक दृष्टीने दखल घेतील. तसेच, रेल्वे बोर्डातील वरिष्ठ अधिकारीही पदोन्नती आणि स्थानांतरण प्रक्रियेमध्ये असलेल्या पक्षपातावर गांभीर्याने विचार करतील, अशी अपेक्षा आहे.


Comments
Add Comment

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय