Railway Employees promotion : रेल्वेच्या पदोन्नती प्रक्रियेत घोळ!

  35

रेल्वे युनियनचा पदोन्नती प्रक्रियेत पक्षपाताचा आरोप; रेल्वेमंत्र्यांकडे केली चौकशीची मागणी


नवी दिल्ली : भारतीय रेल्वे सिग्नल आणि दूरसंचार अनुरक्षक संघाने (IRSTMU) आरोप केला आहे की रेल्वेमध्ये पदोन्नतीसोबत अनिवार्य स्थानांतरण केले जाते (Railway Employees promotion) आणि त्यात मोठ्या प्रमाणावर पक्षपात होत आहे. संघटनेने २७ फेब्रुवारीला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांना पत्र लिहून सदर गैरप्रकार निदर्शनास आणला असून रिक्त पदांसाठी कर्मचाऱ्यांना त्यांची प्राथमिकता (railway promotion process) निवडण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.


IRSTMU चे महासचिव आलोक चंद्र प्रकाश यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, रेल्वेमध्ये पदोन्नतीसाठी स्पष्ट नियम असले तरी अनेक कर्मचारी पदोन्नती घेण्यास नकार देतात, कारण त्यांना दूरवरच्या किंवा नापसंतीच्या ठिकाणी स्थानांतरित केले जाईल याची भीती असते.



त्यांनी आरोप केला की, केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निकटवर्तीय असलेल्यांनाच इच्छित ठिकाणी नियुक्ती मिळते, तर उर्वरित कर्मचाऱ्यांना दूरच्या ठिकाणी पाठवले जाते. यामुळे त्यांचे कौटुंबिक जीवन विस्कळीत होते आणि अनेक वेळा उद्ध्वस्त होते.


संघटनेचे मत आहे की, या प्रकारच्या नियुक्त्यांमुळे कर्मचारी मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करतात, ज्यामुळे ते पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाहीत आणि कामात अनास्था दाखवतात.



रेल्वे युनियनची रेल्वेमंत्र्यांना सुधारणा करण्याची विनंती


संघटनेने मंत्री वैष्णव यांच्याकडे मागणी केली की, पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना रिक्त पदांची माहिती देण्यात यावी आणि त्यांना स्वतःची प्राधान्यस्थाने सांगण्याची संधी द्यावी.


प्रकाश यांच्या मते, या निर्णयामुळे केवळ पदोन्नती आणि स्थानांतरण प्रक्रियेत पारदर्शकता येईल असे नाही, तर कामाची गुणवत्ता आणि कर्मचार्‍यांच्या कामावरील आदरातही वाढ होईल.


ते पुढे म्हणाले की, रेल्वेमंत्री रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सतत कार्यरत आहेत आणि आम्हाला आशा आहे की ते या मुद्द्याची सकारात्मक दृष्टीने दखल घेतील. तसेच, रेल्वे बोर्डातील वरिष्ठ अधिकारीही पदोन्नती आणि स्थानांतरण प्रक्रियेमध्ये असलेल्या पक्षपातावर गांभीर्याने विचार करतील, अशी अपेक्षा आहे.


Comments
Add Comment

Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व

Longest Tunnel T50 Vande Bharat : जम्मू-श्रीनगर-बारामुला रेल्वेमार्गाचे स्वप्न पूर्ण! T-५० मधून सुसाट धावली वंदे भारत; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला प्रवास

जम्मू-कश्मीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी जम्मू-कश्मीरमधील कटरा (Katra) आणि श्रीनगर (Shrinagar) 

काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये दलितांवर अत्याचार, तीन दलित मुलांना खांबाला बांधून बेदम चोपले

गडग : काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये दलितांवर अत्याचार होत असल्याचे वृत्त आहे. कर्नाटकमधील गडग

आरसीबीच्या मार्केटिंग प्रमुखासह चौघांना अटक

बंगळूरु चेंगराचेंगरी प्रकरणी बंगळूरु: बंगळूरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी

पंतप्रधान मोदींना कॅनडाकडून जी-७ संमेलनाचे आमंत्रण

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॅनडाकडून जी-७ संमेलनाचे आमंत्रण देण्यात आले आहे. कॅनडाचे