Railway Employees promotion : रेल्वेच्या पदोन्नती प्रक्रियेत घोळ!

रेल्वे युनियनचा पदोन्नती प्रक्रियेत पक्षपाताचा आरोप; रेल्वेमंत्र्यांकडे केली चौकशीची मागणी


नवी दिल्ली : भारतीय रेल्वे सिग्नल आणि दूरसंचार अनुरक्षक संघाने (IRSTMU) आरोप केला आहे की रेल्वेमध्ये पदोन्नतीसोबत अनिवार्य स्थानांतरण केले जाते (Railway Employees promotion) आणि त्यात मोठ्या प्रमाणावर पक्षपात होत आहे. संघटनेने २७ फेब्रुवारीला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांना पत्र लिहून सदर गैरप्रकार निदर्शनास आणला असून रिक्त पदांसाठी कर्मचाऱ्यांना त्यांची प्राथमिकता (railway promotion process) निवडण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.


IRSTMU चे महासचिव आलोक चंद्र प्रकाश यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, रेल्वेमध्ये पदोन्नतीसाठी स्पष्ट नियम असले तरी अनेक कर्मचारी पदोन्नती घेण्यास नकार देतात, कारण त्यांना दूरवरच्या किंवा नापसंतीच्या ठिकाणी स्थानांतरित केले जाईल याची भीती असते.



त्यांनी आरोप केला की, केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निकटवर्तीय असलेल्यांनाच इच्छित ठिकाणी नियुक्ती मिळते, तर उर्वरित कर्मचाऱ्यांना दूरच्या ठिकाणी पाठवले जाते. यामुळे त्यांचे कौटुंबिक जीवन विस्कळीत होते आणि अनेक वेळा उद्ध्वस्त होते.


संघटनेचे मत आहे की, या प्रकारच्या नियुक्त्यांमुळे कर्मचारी मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करतात, ज्यामुळे ते पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाहीत आणि कामात अनास्था दाखवतात.



रेल्वे युनियनची रेल्वेमंत्र्यांना सुधारणा करण्याची विनंती


संघटनेने मंत्री वैष्णव यांच्याकडे मागणी केली की, पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना रिक्त पदांची माहिती देण्यात यावी आणि त्यांना स्वतःची प्राधान्यस्थाने सांगण्याची संधी द्यावी.


प्रकाश यांच्या मते, या निर्णयामुळे केवळ पदोन्नती आणि स्थानांतरण प्रक्रियेत पारदर्शकता येईल असे नाही, तर कामाची गुणवत्ता आणि कर्मचार्‍यांच्या कामावरील आदरातही वाढ होईल.


ते पुढे म्हणाले की, रेल्वेमंत्री रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सतत कार्यरत आहेत आणि आम्हाला आशा आहे की ते या मुद्द्याची सकारात्मक दृष्टीने दखल घेतील. तसेच, रेल्वे बोर्डातील वरिष्ठ अधिकारीही पदोन्नती आणि स्थानांतरण प्रक्रियेमध्ये असलेल्या पक्षपातावर गांभीर्याने विचार करतील, अशी अपेक्षा आहे.


Comments
Add Comment

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील

संरक्षण दलाच्या तिन्ही दलांसाठी ७९ हजार कोटी

नवी दिल्ली  : भारताच्या तिन्ही सैन्य दलांना अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक मोठा

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान बुद्धांना भगवान