Railway Employees promotion : रेल्वेच्या पदोन्नती प्रक्रियेत घोळ!

रेल्वे युनियनचा पदोन्नती प्रक्रियेत पक्षपाताचा आरोप; रेल्वेमंत्र्यांकडे केली चौकशीची मागणी


नवी दिल्ली : भारतीय रेल्वे सिग्नल आणि दूरसंचार अनुरक्षक संघाने (IRSTMU) आरोप केला आहे की रेल्वेमध्ये पदोन्नतीसोबत अनिवार्य स्थानांतरण केले जाते (Railway Employees promotion) आणि त्यात मोठ्या प्रमाणावर पक्षपात होत आहे. संघटनेने २७ फेब्रुवारीला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांना पत्र लिहून सदर गैरप्रकार निदर्शनास आणला असून रिक्त पदांसाठी कर्मचाऱ्यांना त्यांची प्राथमिकता (railway promotion process) निवडण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.


IRSTMU चे महासचिव आलोक चंद्र प्रकाश यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, रेल्वेमध्ये पदोन्नतीसाठी स्पष्ट नियम असले तरी अनेक कर्मचारी पदोन्नती घेण्यास नकार देतात, कारण त्यांना दूरवरच्या किंवा नापसंतीच्या ठिकाणी स्थानांतरित केले जाईल याची भीती असते.



त्यांनी आरोप केला की, केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निकटवर्तीय असलेल्यांनाच इच्छित ठिकाणी नियुक्ती मिळते, तर उर्वरित कर्मचाऱ्यांना दूरच्या ठिकाणी पाठवले जाते. यामुळे त्यांचे कौटुंबिक जीवन विस्कळीत होते आणि अनेक वेळा उद्ध्वस्त होते.


संघटनेचे मत आहे की, या प्रकारच्या नियुक्त्यांमुळे कर्मचारी मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करतात, ज्यामुळे ते पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाहीत आणि कामात अनास्था दाखवतात.



रेल्वे युनियनची रेल्वेमंत्र्यांना सुधारणा करण्याची विनंती


संघटनेने मंत्री वैष्णव यांच्याकडे मागणी केली की, पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना रिक्त पदांची माहिती देण्यात यावी आणि त्यांना स्वतःची प्राधान्यस्थाने सांगण्याची संधी द्यावी.


प्रकाश यांच्या मते, या निर्णयामुळे केवळ पदोन्नती आणि स्थानांतरण प्रक्रियेत पारदर्शकता येईल असे नाही, तर कामाची गुणवत्ता आणि कर्मचार्‍यांच्या कामावरील आदरातही वाढ होईल.


ते पुढे म्हणाले की, रेल्वेमंत्री रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सतत कार्यरत आहेत आणि आम्हाला आशा आहे की ते या मुद्द्याची सकारात्मक दृष्टीने दखल घेतील. तसेच, रेल्वे बोर्डातील वरिष्ठ अधिकारीही पदोन्नती आणि स्थानांतरण प्रक्रियेमध्ये असलेल्या पक्षपातावर गांभीर्याने विचार करतील, अशी अपेक्षा आहे.


Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना