Tuesday, May 13, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच!

निवडणूक प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर


नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था प्रकरणाची सुनावणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) काही मिनिटे पार पडली. मात्र, दोन्ही बाजूंना आपले म्हणणे स्पष्टपणे न मांडता आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आणि पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर पडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body elections) आता पावसाळ्यापूर्वी होण्याची शक्यता कमी असल्याचे कायदा क्षेत्रातील जाणकरांचे मत आहे.



मंगळवारच्या सुनावणीत सुरुवातीलाच सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्य सरकारच्या वतीने न्यायालयाला दोन दिवसांचा वेळ मागितला होता. यावर न्यायालयाने दोन्ही बाजूंना या प्रकरणासंबंधी विचारणा केली. त्यामुळे आता पावसाळ्यानंतरच या निवडणुका होण्याची शक्यता असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पुढील सुनावणी ६ मे रोजी होणार आहे.

Comments
Add Comment