ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताविरुद्ध न्यूझीलंड खेळणार, दक्षिण आफ्रिकेचा पराभव

लाहोर : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या फायनलमध्ये खेळणारा दुसरा संघ ठरला आहे. आता भारताविरुद्ध फायनलमध्ये न्यूझीलंड खेळणार आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा सेमीफायनलचा सामना खेळवण्यात आला होता. यात न्यूझीलंड संघाने बाजी मारली.


न्यूझीलंडच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ६ बाद ३६२ धावांचा डोंगर उभारला होता. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हे आव्हान काही पेलवले नाही आणि अखेरीस त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. आफ्रिकेच्या संघाला ५० षटकांत केवळ ९ बाद ३१२ धावा करता आल्या.


दक्षिण आफ्रिकेच्या काही फलंदाजांनी चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. शेवटच्या क्षणापर्यंत डेविड मिलरनेही चांगली लढत दिली मात्र त्यांनी जर शेवटी शेवटी केलेली फटकेबाजी आधी केली असती तर कदाचित त्यांना विजय मिळवता आला असता.


डेविड मिलरने या सामन्यात १०० धावा केल्या. टेम्बा बावुमाने या सामन्यात ५६ धावा केल्या. तर रॅसी वॅन डेर डुसेनने ६९ धावांची खेळी केली.


तत्पूर्वी, न्यूझीलंडने ५० षटकांत ६ बाद ३६२ धावा केल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड तोडला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या हंगामात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध ५ बाद ३५६ धावा केल्या होत्या.


टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकांत ६ बाद ३६२ धावा केल्या. सामन्यात न्यूझीलंडची सुरूवात चांगली राहिली. विल यंग आणि रचिन रवींद्रने मिळून ७.५ षटकांत ४८ धावांची भागीदारी केली. यंग २२ धावा करून परतला. त्यानंतर केन विल्यमसन्स आणि रचिन रवींद्रने दुसऱ्या विकेटसाठी १६४ धावांची भागीदारी केली. रचिन रवींद्नने १०८ धावांची खेळी केली. तर केन विल्यमसन्सने १०२ धावा फटकावल्या.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे