Champions Trophy 2025: भारताच्या विजयाने रोहितच्या नावावर ऐतिहासिक रेकॉर्ड, धोनी-विराटला टाकले मागे

  78

मुंबई: भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या सेमीफायनलमध्ये दमदार कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाला हरवले. टीम इंडियाने दुबईत खेळवण्यात आलेल्या सामन्यात ४ विकेटनी विजय मिळवला. यासोबतच भारत फायनलमध्ये पोहोचला आहे. संघाच्या विजयासोबत कर्णधार रोहित शर्माच्या नावावर खास रेकॉर्ड झाला. त्याने इतिहास रचला आहे. रोहित आयसीसीच्या चार स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला कर्णधार ठरला आहे.


ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना २६४ धावा केल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने ४८.१ षटकांत ६ विकेट गमावत हे लक्ष्य पूर्ण करत सामना जिंकला. विराट कोहलीने कमालीची फलंदाजी केली. कोहलीने ९८ बॉलचा सामना करताना ८४ धावा ठोकल्या. तर श्रेयस अय्यरने ४५ धावांची खेळी केली. लोकेश राहुल ४२ धावांवर नाबाद राहिला. भारताने हा सामना ४ विकेट राखत जिंकला.



याबाबतीत रोहित धोनी-विराटच्या पुढे


रोहित चार आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला कर्णधार ठरला आहे. त्याने याबाबतीत महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीलाही मागे टाकले. भारताने धोनीच्या नेतृत्वात तीन महत्त्वाचे खिताब जिंकले होते. मात्र धोनीच्या नेतृत्वात संघाला चार स्पर्धांच्या फायनलमध्ये खेळता आले नव्हते. भारताने धोनीच्या नेतृत्वात टी-२० वर्ल्डकप २००७, वनडे वर्ल्डकप २०११ आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३मधील जेतेपद जिंकले होते.



रोहितच्या नेतृत्वात खेळले हे फायनल सामने


भारताने रोहितच्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३मध्ये स्थान मिळवले होते. येथे ऑस्ट्रेलियाने त्यांना २०९ धावांनी हरवले होते. यानंतर ते वनडे वर्ल्डकप २०२३च्या फायनलमध्ये पोहोचले. येथेही त्यांना ऑस्ट्रेलियाने हरवले होते. भारताने रोहितच्या नेतृत्वात टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये फायनलमध्ये स्थान मइळवले. हा खिताब टीम इंडियाने जिंकला. त्यानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या फायनलमध्ये ते पोहोचले आहेत.

Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला