Champions Trophy 2025: भारताच्या विजयाने रोहितच्या नावावर ऐतिहासिक रेकॉर्ड, धोनी-विराटला टाकले मागे

मुंबई: भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या सेमीफायनलमध्ये दमदार कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाला हरवले. टीम इंडियाने दुबईत खेळवण्यात आलेल्या सामन्यात ४ विकेटनी विजय मिळवला. यासोबतच भारत फायनलमध्ये पोहोचला आहे. संघाच्या विजयासोबत कर्णधार रोहित शर्माच्या नावावर खास रेकॉर्ड झाला. त्याने इतिहास रचला आहे. रोहित आयसीसीच्या चार स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला कर्णधार ठरला आहे.


ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना २६४ धावा केल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने ४८.१ षटकांत ६ विकेट गमावत हे लक्ष्य पूर्ण करत सामना जिंकला. विराट कोहलीने कमालीची फलंदाजी केली. कोहलीने ९८ बॉलचा सामना करताना ८४ धावा ठोकल्या. तर श्रेयस अय्यरने ४५ धावांची खेळी केली. लोकेश राहुल ४२ धावांवर नाबाद राहिला. भारताने हा सामना ४ विकेट राखत जिंकला.



याबाबतीत रोहित धोनी-विराटच्या पुढे


रोहित चार आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला कर्णधार ठरला आहे. त्याने याबाबतीत महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीलाही मागे टाकले. भारताने धोनीच्या नेतृत्वात तीन महत्त्वाचे खिताब जिंकले होते. मात्र धोनीच्या नेतृत्वात संघाला चार स्पर्धांच्या फायनलमध्ये खेळता आले नव्हते. भारताने धोनीच्या नेतृत्वात टी-२० वर्ल्डकप २००७, वनडे वर्ल्डकप २०११ आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३मधील जेतेपद जिंकले होते.



रोहितच्या नेतृत्वात खेळले हे फायनल सामने


भारताने रोहितच्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३मध्ये स्थान मिळवले होते. येथे ऑस्ट्रेलियाने त्यांना २०९ धावांनी हरवले होते. यानंतर ते वनडे वर्ल्डकप २०२३च्या फायनलमध्ये पोहोचले. येथेही त्यांना ऑस्ट्रेलियाने हरवले होते. भारताने रोहितच्या नेतृत्वात टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये फायनलमध्ये स्थान मइळवले. हा खिताब टीम इंडियाने जिंकला. त्यानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या फायनलमध्ये ते पोहोचले आहेत.

Comments
Add Comment

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून