ICC Champions Trophy 2025 : पराभवाचा बदला घेतला, कांगारूंना हरवत भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये

दुबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवत भारताने फायनलमध्ये शानदार प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला ४ विकेट राखत हरवले. या विजयासोबतच भारताने २०२३मधील पराभवाचा बदला घेतला. अहमदाबादच्या स्टेडियमवर २०२३मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हरवत भारतीय चाहत्यांची मने दुखावली होती. हा बदला भारताने घेतला.


ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २६४ धावा केल्या होत्या. भारतासमोर विजयासाठी २६५ धावांचे आव्हान होते. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ठेवलेले २६५ धावांचे आव्हान ४ विकेट राखत पूर्ण केले. हार्दिक पांड्यानेही शेवटी दमदार खेळ करताना भारतासाठी विजयश्री खेचून आणली. त्याआधी विराट कोहलीने विजयाचा पाया रचला होता. यासोबतच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचणारा भारतीय पहिला संघ ठरला आहे.


पाकिस्तानविरुद्ध दमदार खेळी करणाऱ्या विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धही संयमी खेळी केली. विराट कोहलीने ९८ बॉलमध्ये ८४ धावा ठोकल्या. तर श्रेयस अय्यरचे अर्धशतक पाच धावांनी हुकले. त्याने ६२ बॉलमध्ये ४५ धावा केल्या. अय्यर बाद झाल्यानंतर अक्षऱ पटेलने पटापट २७ धावा करत धावसंख्या वाढवली मात्र त्याला अधिक धावा करता आल्या नाहीत. हार्दिक पांड्यानेही आल्यानंतर दमदार खेळीला सुरूवात केली. त्याच्या जबरदस्त खेळीमुळे भारताचा विजय पक्का झाला. त्याने २४ बॉलमध्ये २८ धावा केल्या.



ऑस्ट्रेलियाचे २६५ धावांचे आव्हान


तत्पूर्वी, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २६४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. तर अॅलेक्स कॅरेने ६१ धावा ठोकल्या. भारताकडून या सामन्यात मोहम्मद शमीने ३ विकेट घेतल्या. तर वरूण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.



पराभवाचा बदला घेतला


१९ नोव्हेंबर २०२३मध्ये भारतीय चाहत्यांच्या डोळ्यात दुखा:चे अश्रू होते. मात्र आता हे आनंदाश्रूमध्ये परतले आहेत. २०२३च्या वर्ल्डकपमध्ये भारताला मिळालेल्या पराभवाचा बदला टीम इंडियाने अखेर घेतला. फायनलच्या त्या जखमेवर आजच्या विजयाने मलम लावले आहे.

Comments
Add Comment

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर

भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई