SRA scheme : एसआरए योजनेतील घर यापुढे पति-पत्नीच्या नावे होणार

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा महत्वाचा निर्णय


मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील (एसआरए - SRA scheme) घरावर यापुढे पति-पत्नी यांच्या संयुक्त नावाची नोंद होणार आहे. याबाबतचा निर्णय मुंबई महानगरप्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत घेण्यात आला आहे.


महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी त्यांना पतिच्या मालमत्तेमध्ये हक्क देणे ही मुलभूत गरज आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पति-पत्नी यांना एकरूप एक घटक मानला जातो व प्राप्त संपत्ती दोघांची असल्याचे मानले जाते. त्यामुळे स्त्रियांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी त्यांच्या राहत्या घराची नोंद पति-पत्नी दोघांच्या नावे असणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा पतिच्या निधनानंतर पतिच्या मालमत्तेमध्ये हक्क प्रस्थापित करताना महिलांना अनेक कायदेशिर अडचणींना सामोरे जावे लागते. जर आधीच पति-पत्नीचे हक्क झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या परिशिष्ट-।। मध्ये असेल तर अशा अडचणी येणार नाहीत. यासाठी सुरूवात म्हणून पुर्नविकासानंतर मिळणारे घर हे पति आणि पत्नीच्या संयुक्त नावे करणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेत प्राधिकरणाने आता संयुक्त मालकीवर शिक्कामोर्तब केला आहे.



झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या महिलांच्या सबलीकरणासाठी मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने अतिशय महत्त्व पुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर निर्णयासंदर्भात परिपत्रक काढत प्राधिकरणाने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील झोपडपट्टीवासियांसाठी पुर्नविकासाअंतर्गत हा निर्णय लागू केला आहे.


प्राधिकरणाच्या या नव्या निर्देशानंतर सक्षम प्राधिकारी यांनी योजनेचे परिशिष्ट-2 निर्गमित करताना पति-पत्नी यांचे संयुक्त नावाने निर्गमित करावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. परिशिष्ट-2 प्रमाणे पुनर्वसन इमारतीमध्ये सदनिका वितरित करतेवेळी सदनिका वाटपपत्रावर पति-पत्नी दोघांचे नाव नोंद करून सदनिका वितरीत करण्यात यावी. याव्यतिरिक्त सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक यांनीही मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या पुनर्वसन योजनेतील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थेस सदनिकाधारकांना भाग दाखला तसेच सदस्यत्व देते वेळी पतिसह पत्नीच्या नावाची "संयुक्त सभासद" म्हणून नोंद घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Water Storage in Mumbai : जुलैच्या सरींकडे मुंबईकरांच्या नजरा खिळल्या, तलावांत केवळ ८.५ टक्के पाणीसाठा; २० ऑगस्टपर्यंत पुरेल पाणी

मुंबई  : मुंबईत मंगळवारपासून पुढील तीन दिवस पाऊस पडेल. मात्र, हा पाऊस पडला तरी तो ३० जूनपर्यंत या संपूर्ण

IAS Transfer : पी. वेलरासू यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि महापारेषणमधील

Chandrakant Patil : पॉलीटेक्निक प्रवेश अर्जासाठी 2 जुलैपर्यंत मुदतवाढ; 1.45 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील मुंबई,  : प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक)

Monsoon Update : मान्सूनच्या प्रगतीमुळे राज्यात आनंदाचे वातावरण

मुंबई : बहुप्रतिक्षित मान्सूनने अखेर दोन आठवड्यांच्या विलंबानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पुढे वाटचाल सुरू

Temple Endowment Law : नवा देवस्थान इनाम जमीन कायदा सर्वंकष न्याय देणारा असेल, महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : राज्यातील देवस्थान इनाम जमिनींचे संवर्धन करण्यासह वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले समस्या मार्गी

Bangladeshi infiltrators : अडीच वर्षांत महाराष्ट्रातून ३ हजार ५४१ बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी

मुंबई : वर्ष २०२४ पासून आजपर्यंत म्हणजेच गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातून