Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात कारची एसटी बसचा जोरदार धडक! कारचा चक्काचूर, दोघांचा जागीच मृत्यू




रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. एसटी बस आणि चारचाकी गाडीची जोरदार धडक झाली असून यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे. (Tamhini Ghat Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी दीट वाजेच्या सुमारास ही घटना घडली. खेड-चिंचवड दिशेने जाणाऱ्या एसटी बसला बसला विळे गावाच्या दिशेकडे येणाऱ्या स्विफ्ट कारची धडक बसली. उतार व वेग असल्यामुळे, तसेच गाडीवरील ताबा सुटल्याने स्विफ्ट कार एसटी बसला समोर जाऊन धडकली. ही धडक एवढी जोरदार होती, की यामध्ये स्विफ्ट चालकाच्या बाजूचा भाग बसमध्ये शिरून पूर्ण चेपला गेला आहे. त्यामुळे कारचालक व चालकाच्या पाठीमागे बसलेली ज्येष्ठ महिला

यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच हे दोन्ही मृतदेह कारमध्येच अडकून पडले.


दरम्यान, दुपारी ३ वाजेच्या सुमारास डकलेले मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आले. तीन जखमींना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमीमध्ये एका लहान मुलीचा देखील समावेश आहे. तर, एसटी मधील कोणीही जखमी झाले नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. (Tamhini Ghat Accident)


Comments
Add Comment

Kolhapur Shri Mahalakshmi Temple : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतले अंबाबाईचे दर्शन; मुख्यमंत्री आणि अमित शहांच्या उपस्थितीत १,४४५ कोटींच्या विकासकामांना सुरुवात

केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज

Pavanraje Nimbalkar Murder Case : आरोपींची निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी पद्मसिंह पाटीलांसह सर्व आरोपी निर्दोष

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या आणि तब्बल दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या पवनराजे

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीसाठी ‘लालपरी’ सज्ज! पंढरपूरसाठी ५,५०० विशेष एसटी बसेस; ४० भाविकांनी मागणी केली तर गावातूनच थेट सेवा

मुंबई : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलभक्तांच्या सेवेसाठी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) मोठी तयारी

Rajmata Jijau Women's Empowerment Scheme : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना मिळणार केवळ १ रुपयात जमीन

- महिलांच्या सक्षमीकरणाला चालना मुंबई : राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आणि विशेषतः

Monsoon : राज्यात २५ जूननंतर मान्सून सक्रीय होणार, हवामान खात्याचा नवा अंदाज

मुंबई : देशभरात मान्सूनच्या प्रगतीने पुन्हा एकदा मोठी विश्रांती घेतल्याचे चित्र दिसत आहे. सलग तिसऱ्या वर्षी

Crime News : प्रेमासाठी मित्रानेच मित्राची केली हत्त्या ; मुलगी एक प्रियकर दोन अन् पुढे...

नवी मुंबई : प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असत हे आजवर आपण ऐकत आलो आहे मात्र हे कधी सत्यात होताना पाहिलं आहे का?