Supriya Sule : अत्याचाराच्या घटनांवर खासदार सुप्रिया सुळे यांचा संताप; आरोपींना भरचौकात फाशी द्या

पुणे : स्वारगेट बस डेपोमध्ये (Swargate Bus Depo) मंगळवारी (२५ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला ७० तासांनंतर अटक करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाडीची घटना समोर आली. या वाढत्या घटनांवर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


आज माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “महाराष्ट्रात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः महिलांवरील अत्याचारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. चाकणमध्ये पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला झाला. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड झाली आणि स्वारगेट बसस्थानकात एका तरुणीवर अत्याचार झाला. या सर्व घटना गंभीर असून, त्याचा मी तीव्र निषेध करते. महिलांची सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची आहे, मात्र राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे.”



"अत्याचारासारख्या घटनांसाठी कठोर शिक्षा आवश्यक"


सुळे (Supriya Sule) पुढे म्हणाल्या, “स्वारगेटसारख्या घटना सातत्याने घडत आहेत, जे अत्यंत दुर्दैवी आहे. ही घटना अंधारात, कोपऱ्यात नाही, तर एका सार्वजनिक ठिकाणी घडली. पीडित मुलीला प्रचंड भीती दाखवली गेली. समाजाने महिलांवरील कोणत्याही अत्याचाराचा जाहीर निषेध केला पाहिजे.”


याआधी बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेवेळीही त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती की, “महाराष्ट्राने संपूर्ण देशासमोर उदाहरण निर्माण करावे. बलात्कार आणि अत्याचाराच्या घटनांसाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांमध्ये खटले चालवून आरोपींना भरचौकात फाशी द्यावी.” त्यांनी पुन्हा एकदा हीच मागणी केली आहे.



सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह


या प्रकरणावर सुरुवातीला डीसीपींनी सांगितले होते की, पीडित तरुणीने ओरडले नाही. तर गृहराज्यमंत्री म्हणाले होते की, तरुणीने संघर्ष केला नाही. या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त करत सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “हे धक्कादायक आहे. मी महाराष्ट्र सरकारला विचारते— तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींविषयी इतकी आत्मीयता दाखवता, मग स्वारगेट प्रकरणात सरकारने दिलेलं वक्तव्य योग्य आहे का? पदावर असणाऱ्या व्यक्तींनी जबाबदारीने बोलले पाहिजे आणि संवेदनशीलता दाखवली पाहिजे.”

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा

Special Trains : मुंबई आणि मडगाव दरम्यान धावणार ४ साप्ताहिक विशेष गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई: आठवड्याच्या अखेरीस आणि आगामी सणासुदीच्या काळात प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक

Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी

मुंबई : क्रीडा क्षेत्रात देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय

Shrinivas Vinayak Kulkarni : मराठी साहित्यातील तेजस्वी पर्व संपले; मौज नियतकालिकाचे संपादक आणि 'डोह'कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas

Mangal Prabhat Lodha : म्हाडासाठी राखीव घरे न देणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करा; गरज पडल्यास कारागृहात पाठवा - मंत्री मंगल प्रभात लोढा

नागरिक आणि म्हाडा मधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याच्या मंत्री लोढा यांच्या

Samagra Shiksha Abhiyan : २२ वर्षांचा संघर्ष अखेर संपला! समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ३,२७६