नवी मुंबई परिसरामध्ये महा स्वच्छता अभियान

नवी मुंबई: नवी मुंबई हे दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे शहर असून नवी मुंबईतील अनेक क्षेत्रे वर्दळीची आहेत. या रस्त्यांची नियमित स्वच्छता करण्याप्रमाणेच विशेषत्वाने महामार्ग व दुर्लक्षित ठिकाणे यांची सखोल स्वच्छता करण्याकडे महापालिका आयुक्त . कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष देण्यात येत आहे.

स्वच्छ सर्वेक्षणाच्या सुपर स्वच्छ लीग या विशेष कॅटेगरीत देशातील तीन शहरांमध्ये समाविष्ट असलेल्या नवी मुंबईचा स्वच्छ शहर हा नावलौकिक कायम रहावा यादृष्टीने महानगरपालिका नेहमीच सतर्कतेने कार्यरत असते. याकामी नागरिकांचाही विविध उपक्रमांमध्ये विशेष सहभाग असतो. याच अनुषंगाने डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ निरूपणकार डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या 103 व्या जयंती दिनानिमित्त नवी मुंबई परिसरामध्ये ‘महा स्वच्छता’ अभियानाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार स्वच्छता मोहीमेत व्यापक प्रमाणात लोकसहभाग लाभेल या भूमिकेतून नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठही विभागांत रस्त्यांच्या दुतर्फा स्वच्छता मोहीमेचे नियोजन करण्यात आले.


स्वच्छताविषयक उपक्रमांनी प्रेरित झालेल्या 3050 हून अधिक श्रीसदस्य नागरिकांनी नवी मुंबईतील अंतर्गत रस्त्यांची साफसफाई करुन यशस्वीरित्या मोहीम राबवली. या महा स्वच्छता मोहीमेचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले होते. वाशी, नेरूळ, बेलापूर, कोपरखैरणे, ऐरोली, या विभाग कार्यालयांच्या हद्दीत येणा-या सर्व अंतर्गत रस्त्यांच्या स्वच्छता मोहीमेत डॉ श्री‌ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्रीसदस्य यांना अंतर्गत रस्त्यावरील क्षेत्र वाटप करून देण्यात आले होते. या मोहिमेत बेलापूर विभाग अंतर्गत सहा ठिकाणी 14 कि.मी क्षेत्रफळात 193 श्रीसदस्यांनी 644 किलो कचरा एकत्रित केला. नेरूळ विभाग अंतर्गत तेरा ठिकाणी 16.10 कि.मी क्षेत्रफळात 801 श्रीसदस्यांनी 3119 किलो कचरा एकत्रित केला. वाशी व तुर्भे विभाग अंतर्गत अठरा ठिकाणी 25.60 कि.मी क्षेत्रफळात 605 श्रीसदस्यांनी 2629 किलो कचरा एकत्रित केला. कोपरखैरणे विभाग अंतर्गत 12 ठिकाणी 18.20 कि.मी क्षेत्रफळात 697 श्रीसदस्यांनी 1653 किलो कचरा एकत्रित केला. घणसोली ते दिघा विभाग अंतर्गत 23 ठिकाणी 46.15 कि.मी क्षेत्रफळात 753 श्रीसदस्यांनी 2947.50 किलो कचरा संकलित केला. अशाप्रकारे एकूण 3049 श्रीसदस्यांनी 10992.30 किलो कचरा एकत्रित करण्यात आला.

Comments
Add Comment

महिला शेतकऱ्यांच्या श्रमाला कायद्याचे कवच

विधानसभेत विशेष विधेयक; जमिनीची प्रत्यक्ष मालकी नसली तरी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा मुंबई (सुहास

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सियाचा व्हिडिओ व्हायरल

सिया-चेतनच्या कथित नात्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; तपासाला नवे वळण? पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या

Vidhan Sabha : महत्त्वाच्या चर्चेवेळी अधिकाऱ्यांची दांडी, नगरविकास सचिवांना विधानसभा अध्यक्षांची नोटीस

मुंबई : मुंबईशी (Mumbai) संबंधित अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयांवर विधानसभेत चर्चा सुरू असताना, अधिकारी

Maharashtra Rain Alert : हवामान विभागाचा इशारा: राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढचे १०० तास महत्त्वाचे

पुढील आठवड्यात महाराष्ट्रात दमदार पाऊस  मुंबई : पुणे वेधशाळेने ५ ते ७ जुलैदरम्यान महाराष्ट्रभर समाधानकारक ते

Nitesh Rane : मुंद्रा पोर्टच्या अत्याधुनिक व्यवस्थापनाचा महाराष्ट्राच्या बंदर विकासासाठी उपयोग होणार – नितेश राणे

आधुनिक बंदर व्यवस्थापनाचा महाराष्ट्राला लाभ; करण अदानींसोबत नितेश राणेंची चर्चा News: मुंबई : महाराष्ट्राचे

Pankaja Munde : वाडी नगरपरिषदेचा एसटीपी प्रकल्प ३० ऑगस्टपर्यंत कार्यान्वित होणार

पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांची विधान परिषदेत ग्वाही मुंबई : नागपूर जिल्ह्यातील वाडी नगरपरिषदेच्या हद्दीतील