Weather Update : राज्यात उष्णतेच्या लाटा अन् पावसाचा अंदाज

मुंबई : राज्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाच्या असह्य झळा जाणवल्या.त्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरण्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. आता हिवाळा संपून उन्हाळ्याला सुरुवात झाली. मार्च महिन्यात उष्णतेचा पारा आणखी चढण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत मार्चमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटा येणार असून अंगाची लाही लाही होणार आहे. अशातच महाराष्ट्रातील काही भागात ऊन-पावसाचा खेळ रंगण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा मार्च अधिक तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत.



राज्याच्या बहुतांश भागात मार्च महिन्यात कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता आहे. उन्हाच्या झळा आणखी वाढणार आहे. तसेच या काळात ९ ते १५दिवसांपर्यंत टिकून राहणाऱ्या उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.


दरम्यान, यंदा उन्हाळ्यात देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा तापमानाचा पारा जास्त राहण्याची शक्यता आहे. या काळात सगळीकडे किमान तापमानात देखील मोठी वाढ होणार आहे. मार्च महिन्यापासूनच उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असून याबाबत हवामान विभागाने इशारा दिला आहे. महाराष्ट्रासह राजस्थान, गुजारात, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगाणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांत उष्णतेचा तीव्र लाटांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध