विदर्भाने सात वर्षात तिसऱ्यांदा जिंकली रणजी ट्रॉफी

नागपूर : विदर्भाने सात वर्षात तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली. यंदा रणजी ट्रॉफी २०२४ - २५ चा अंतिम सामना विदर्भ आणि केरळ यांच्यात झाला. करुण नायरने दोन्ही डावात छान फलंदाजी केली. त्याने दुसऱ्या डावात शतक झळकावले. यामुळे विदर्भाने अंतिम सामन्यात केरळचा सहज पराभव केला.विदर्भाने याआधी २०१७ - १८ आणि २०१८ - १९ मध्ये रणजी ट्रॉफी जिंकली. विशेष म्हणजे २०२४ - २५ च्या हंगामात रणजी ट्रॉफीमध्ये विदर्भ संघाने एकही सामना गमावलेला नाही.

रणजी ट्रॉफी २०२४ - २५ च्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे केरळला भोवले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या विदर्भाने पहिल्या डावात सर्वबाद ३७९ आणि दुसऱ्या डावात ९ बाद ३७५ धावा केल्या. तर केरळने पहिल्या डावात सर्वबाद ३४२ धावा केल्या. टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलेल्या करुण नायरने विदर्भाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. करुणने पहिल्या डावात ८६ आणि दुसऱ्या डावात १३५ धावा केल्या. सामनावीर झालेल्या विदर्भच्या दानिशने पहिल्या डावात १५३ आणि दुसऱ्या डावात ७३ धावा केल्या. विदर्भचाच हर्ष दुबे मालिकावीर झाला. नियमानुसार पाच दिवसांचा खेळ संपल्यानंतर सामना अनिर्णित जाहीर करण्यात आला.

रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना अनिर्णित राहिला, तर पहिल्या डावाच्या आधारे जास्त धावा करणाऱ्या संघाला विजेता घोषित केले जाते. विदर्भ विरुद्ध केरळ अंतिम सामन्यात, विदर्भाने पहिल्या डावात ३७९ धावा केल्या होत्या. केरळने पहिल्या डावात ३४२ धावा केल्या होत्या. पहिल्या डावाच्या आधारे विदर्भाने ३७ धावांची आघाडी घेतली होती.

यंदाच्या रणजीच्या हंगामात विदर्भ संघाने सर्वोत्तम कामगिरी केली, त्यांनी एकही सामना गमावलेला नाही. यंदाच्या हंगामात विदर्भ संघ आठ सामने खेळला. यातील सात सामन्यांत त्यांचा विजय झाला आणि एक सामना अनिर्णित राहिला. याउलट केरळ संघ सात पैकी तीन सामने जिंकला. पण त्यांचे चार सामने अनिर्णित राहिले.
Comments
Add Comment

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

जोकोविचला नमवत कार्लोसची ऑस्ट्रेलियन ओपनला गवसणी

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन २०२६च्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या युवा खेळाडू कार्लोस