विदर्भाने सात वर्षात तिसऱ्यांदा जिंकली रणजी ट्रॉफी

  100

नागपूर : विदर्भाने सात वर्षात तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली. यंदा रणजी ट्रॉफी २०२४ - २५ चा अंतिम सामना विदर्भ आणि केरळ यांच्यात झाला. करुण नायरने दोन्ही डावात छान फलंदाजी केली. त्याने दुसऱ्या डावात शतक झळकावले. यामुळे विदर्भाने अंतिम सामन्यात केरळचा सहज पराभव केला.विदर्भाने याआधी २०१७ - १८ आणि २०१८ - १९ मध्ये रणजी ट्रॉफी जिंकली. विशेष म्हणजे २०२४ - २५ च्या हंगामात रणजी ट्रॉफीमध्ये विदर्भ संघाने एकही सामना गमावलेला नाही.

रणजी ट्रॉफी २०२४ - २५ च्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे केरळला भोवले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या विदर्भाने पहिल्या डावात सर्वबाद ३७९ आणि दुसऱ्या डावात ९ बाद ३७५ धावा केल्या. तर केरळने पहिल्या डावात सर्वबाद ३४२ धावा केल्या. टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलेल्या करुण नायरने विदर्भाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. करुणने पहिल्या डावात ८६ आणि दुसऱ्या डावात १३५ धावा केल्या. सामनावीर झालेल्या विदर्भच्या दानिशने पहिल्या डावात १५३ आणि दुसऱ्या डावात ७३ धावा केल्या. विदर्भचाच हर्ष दुबे मालिकावीर झाला. नियमानुसार पाच दिवसांचा खेळ संपल्यानंतर सामना अनिर्णित जाहीर करण्यात आला.

रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना अनिर्णित राहिला, तर पहिल्या डावाच्या आधारे जास्त धावा करणाऱ्या संघाला विजेता घोषित केले जाते. विदर्भ विरुद्ध केरळ अंतिम सामन्यात, विदर्भाने पहिल्या डावात ३७९ धावा केल्या होत्या. केरळने पहिल्या डावात ३४२ धावा केल्या होत्या. पहिल्या डावाच्या आधारे विदर्भाने ३७ धावांची आघाडी घेतली होती.

यंदाच्या रणजीच्या हंगामात विदर्भ संघाने सर्वोत्तम कामगिरी केली, त्यांनी एकही सामना गमावलेला नाही. यंदाच्या हंगामात विदर्भ संघ आठ सामने खेळला. यातील सात सामन्यांत त्यांचा विजय झाला आणि एक सामना अनिर्णित राहिला. याउलट केरळ संघ सात पैकी तीन सामने जिंकला. पण त्यांचे चार सामने अनिर्णित राहिले.
Comments
Add Comment

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे

ICC Rankings : आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतून रोहित-विराटची नावे गायब

दुबई : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची नावे आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतून गायब