Mithi river : मिठी नदीच्या सफाईची निविदा गाळातच अडकली

मायनिंगमधील पोकलेन मशिनचा वापर करण्याची अट भोवली


मुंबई : मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीचे (Mithi river) रुंदीकरण तसेच खोलीकरण करून या नदीला पुनर्रुज्जीवन देण्यासाठी आतापर्यंत सुमारे २ हजार कोटींहून खर्च करण्यात आले आहे. तरीही दरवर्षी मिठी नदीतील गाळ सफाईवर सरासरी ९० कोटी रुपये खर्च केले जात असून या गाळ सफाईच्या कामातील अनियमिततेबाबत एसआयटीच्या माध्यमातून चौकशी सुरु असतानाच आता ठराविक काही कंपन्यांनाच गाळ सफाईचे काम मिळावे यासाठी विभागाचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी मायनिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या पोकलेन मशिनचा वापर करण्याचा घाट घातला जात आहे.


मुंबईतील पुरपरिस्थितीला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले असून सुरुवातीला एमएमआरडीए आणि महापालिकेच्यावतीने संयुक्तपणे सफाईचे काम केले जात असले तरी आता नदीची सफाई पूर्णपणे पालिकेच्यावतीने केली जात आहे. मागील अनेक वर्षांपासून या मिठी नदीतील गाळ काढण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. यासाठी दरवर्षी महापालिकेच्यावतीने निविदा मागवल्या जात आहे. मात्र, यंदाही निविदा मागवताना त्यामध्ये नदीतून गाळ काढण्यासाठी १०५ फुट लांब बूम आणि दीड क्युबिक मीटर क्षमतेचे बकेट असणारे पोकलेन मशीन तैनात करण्याची अट घालण्यात आली आहे.



विशेष म्हणजे केवळ काही कंत्राटदारांना डोळयासमोर ठेवून ही अट घालून आल्याने तसेच याचा वापर मिठी नदीत योगयप्रकारे होतोय किंवा नाही याचे योग्य ते सादरीकरण न करता याची अट घातल्याने महापालिकेच्यावतीने मिठी नदीतील गाळाची निविदा वादात अडकली आहे. त्यामुळे काही कंत्राटदारांनी थेट न्यायालयातच धाव घेवून महापालिकेच्या निविदा प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. न्यायालयातील याचिकेच्या माध्यमातून कंत्राटदार कंपन्यांनी या पोकलेन मशीनचे प्रात्यक्षिक घेण्यात आले होते किंवा ते यशस्वी झाले का याची माहिती प्रशासनाने न देता याचा अट घातल्याने शंका उपस्थित केली आहे.


मागील वर्षी मिठी नदीच्या सफाईकरता ८९ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते, तर यावर्षी ८४ कोटी रुपयांचा अंदाज तयार करून निविदा निमंत्रित केली आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने मिठी नदीचे पात्र अनेक ठिकाणी रुंद आहे, ही बाब लक्षात घेता, नदीतून गाळ काढण्यासाठी ३५ मीटर लांब बूम आणि दीड क्युबिक मीटर बकेट असणारे पोकलेन मशीन तैनात करणे ही अट निविदेमध्ये समाविष्ठ करण्यात आली. जेणेकरून मिठी नदीतून गाळ काढण्याचे काम प्रभावीपणे करता येवू शकेल. परंतु ही निविदा प्रक्रिया अद्यापही अंतिम झालेली नाही. या निविदेच्या अनुषंगाने काही निविदाकारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून याला आव्हान दिले, त्यामुळे ही बाब तुर्त न्यायप्रविष्ठ आहे. यावर पुढील सुनावणी ४ मार्चला होणार असून न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासन पुढील कार्यवाही करेल असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार निविदेतील अटीनुसार तैनात करण्यात येणारी पोकलेन मशिन ही मायनिंगमध्ये वापरली जाते. त्यामुळे मिठी नदीत ती उतरवता येणार नाही तसेच नदी पात्रात उलटली जाण्याची शक्यता आहे. परंतु ज्या पोकलेन मशिनचा पूर्णपणे वापर केलाच गेला नाही त्या पोकलेन मशिनचा आपल्या असल्याचे हमी पत्र देण्याची अट घालून एकप्रकारे उत्पादक कंपनीच्या माध्यमातून ठराविक कंपन्यांना काम मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे,असा आरोपही केला जात आहे.

Comments
Add Comment

Mahalaxmi Dhobi Ghat PNG Gas Connection : महालक्ष्मी धोबीघाट धूरमुक्त होणार! लाकूड-कोळशाला रामराम, १५० पीएनजी गॅस जोडण्यांमुळे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

मुंबई : मुंबईची ऐतिहासिक आणि जागतिक ओळख असलेल्या महालक्ष्मी धोबीघाटाने (Mahalaxmi Dhobighath) आता वायू प्रदूषणावर मात

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा

Special Trains : मुंबई आणि मडगाव दरम्यान धावणार ४ साप्ताहिक विशेष गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई: आठवड्याच्या अखेरीस आणि आगामी सणासुदीच्या काळात प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक

Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी

मुंबई : क्रीडा क्षेत्रात देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय

Shrinivas Vinayak Kulkarni : मराठी साहित्यातील तेजस्वी पर्व संपले; मौज नियतकालिकाचे संपादक आणि 'डोह'कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas

Mangal Prabhat Lodha : म्हाडासाठी राखीव घरे न देणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करा; गरज पडल्यास कारागृहात पाठवा - मंत्री मंगल प्रभात लोढा

नागरिक आणि म्हाडा मधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याच्या मंत्री लोढा यांच्या