'राहुल गांधी हजर व्हा', नाशिकच्या कोर्टाचे निर्देश

नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी न्यायालयात हजर होऊन स्वतःची बाजू मांडावी. जामीन हवा असेल तर आधी स्वतःचे म्हणणे मांडा नंतर जामीन अर्जावर विचार करता येईल; असे नाशिकच्या कोर्टाने सुनावले. यामुळे काँग्रेसचे लोकसभा खासदार राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात हजर व्हावे लागणार आहे. नाशिकच्या कोर्टाने पुढील सुनावणी ९ मे रोजी ठेवली आहे. या सुनावणीवेळी राहुल यांना नाशिकच्या कोर्टात हजर व्हावे लागणार आहे.



राहुल गांधी यांनी 'भारत जोडो' यात्रा काढली होती. राजकीय हेतूने काढलेल्या या यात्रेत वर्धा येथे राहुल यांची सभा झाली. या सभेत बोलताना राहुल यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी सावरकरप्रेमी देवेंद् भुतडा यांनी अॅड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत नाशिकच्या फौजदारी कोर्टात याचिका केली आहे. या याचिकेवर सुनावणी झाली त्यावेळी राहुल यांच्यावतीने जयंत जायभावे आणि आकाश छाजेड यांनी युक्तिवाद केला. सुनावणीवेळी राहुल यांच्यावतीने जामीन मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला. या अर्जावर विचार करत राहुल गांधी यांनी कोर्टात हजर होऊन स्वतःची बाजू मांडावी, असे निर्देश कोर्टाने दिले.
Comments
Add Comment

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश; धान्य वितरणाची मुदत ३० जूनपर्यंत वाढवली

लाखो शिधापत्रिकाधारकांना दिलासा; उद्यापासून स्वस्त धान्य दुकानांमधून पुन्हा वितरण सुरू मुंबई, दि. २४ जून :

Chief Minister Devendra Fadnavis : कॉर्पोरेट जिहाद' रोखण्यासाठी कायद्यात बदल होणार

कॉर्पोरेट जिहादला लगाम, कायद्यात बदल होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; विधानसभा आणि विधान

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात ॲमेझॉनसाठी गुंतवणुकीच्या व्यापक संधी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांची मुख्यमंत्र्यांशी सदिच्छा भेट मुंबई, दि. २४ : डेटा सेंटर

Padma Awards 2026: पद्म पुरस्कारांनी गौरवला महाराष्ट्र; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववानांचा सन्मान

महाराष्ट्रातील मान्यवरांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; पद्म पुरस्कार प्रदान नवी दिल्ली, दि. २४ : देशातील सर्वोच्च

Ashadhi Wari : आषाढी वारीत भाविकांच्या सुविधांना प्राधान्य; कोणतीही गैरसोय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासन सज्ज • आषाढी वारीसाठी सर्व विभागांकडून सुविधांची व्यापक तयारी • डिस्कव्हरी व