Mumbai Weather : सकाळी गारवा, दुपारी उन्हाच्या झळा! पाहा मुंबईत कसे असेल आठवड्याचे तापमान

मुंबई : थंडीचा जोर ओसरत चालला असून उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे कडाक्याची थंडी अनुभवलेल्या मुंबईकरांना फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून उकाड्याला सामोरे (Heat) जावे लागत आहे. त्यामध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे. मार्चच्या पहिल्या दिवसापासून शहरातील किमान व कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे (Weather Update). त्यामुळे मुंबईकरांना उन्हाचा ताप दुपारच्या वेळी अधिकच जाणवत आहे. अशातच आता हवामान विभागाने (Meteorological Department) आठवड्याभराचा हवामान अंदाज वर्तवला असून यामध्ये मुंबईकरांना (Mumbai Weather) सकाळी काहीसा गारवा तर दुपारी उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार असल्याचे म्हटले आहे.



हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई हवामान आणि वायुमानांकन निर्देशांक २५.९९ °C पासून उष्णतेला सुरुवात झाली असून आज मुंबईचे तापमान २८.९१ °C आहे. तर उद्या मुंबईत अनुक्रमे किमान आणि कमाल तापमान २५.६४ °C आणि २९.०३ °C असेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, यावेळी सकाळी ढगाळ वातावरण निर्माण होणार असून दुपारी कडक ऊन असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडताना सनस्क्रीन आणि सनग्लासेस लाऊनच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे.



पुढील ७ दिवसांसाठी मुंबईचे हवामान



  • ३ मार्च २०२५ २८.९१ विखुरलेले ढग असणार आहेत.

  • ४ मार्च २०२५ २९.०१ विखुरलेले ढग असतील.

  • ५ मार्च २०२५ २९.८१ ढगाळ वातावरण

  • ६ मार्च २०२५ २९.३३ आकाश निरभ्र राहिल.

  • ७ मार्च २०२५ २९.८५ आकाश निरभ्र राहिल.

  • ८ मार्च २०२५ २९.०० आकाश निरभ्र राहिल.

  • ९ मार्च २०२५ २८.५९ आकाश निरभ्र राहिल.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील