IND vs NZ: वरूणचा जोरदार 'पंच', भारताने न्यूझीलंडला हरवले

  66

दुबई: वरूण चक्रवर्तीने मारलेल्या जोरदार पंचमुळे भारताने न्यूझीलंडला हरवले आहे. यासोबतच सेमीफायनलमध्ये आता भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारताने न्यूझीलंडला विजयासाठी २५० धावांचे आव्हान दिले होते. मात्र वरूणच्या माऱ्यासमोर किवी संघ पूर्णपणे ढेपाळला. वरूणच्या भेदक माऱ्यामुळे न्यूझीलंडला केवळ २०५ धावाच करता आल्या आणि न्यूझीलंड संघाचा ४४ धावांनी पराभव झाला.


या सामन्यात केन विल्यमसन्सने ८१ धावांची खेळी करत संघाला पराभवापासून रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला इतर कोणाचीही अपेक्षित साथ न लाभल्याने न्यूझीलंडचा पराभव झाला.वरूणने या संपूर्ण सामन्यात ५ विकेट घेतल्या. तर कुलदीप यादवने २ आणि हार्दिक पांड्या, अक्षऱ पटेल, रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


तत्पूर्वी, भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २४९ धावा केल्या होत्या. रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी फटाफट बाद झाली. त्यानंतर आलेला विराट कोहलीही फ्लॉप ठरला. त्याने केवळ ११ धावा केल्या. भारताने ३० धावांमध्ये आपले ३ फलंदाज गमावले होते.


त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांची जोडी क्रीझवर जमली. श्रेयसने ७९ धावा केल्या. तर अक्षर पटेलने ४२ धावांची खेळी केली. लोकेश राहुल २३ धावा करून परतला. हार्दिक पांड्याने ४५ धावा ठोकल्या. रवींद्र जडेजाला १६ धावा करता आल्या. मोहम्मद शमीने ५ धावा केल्या.


भारताने न्यूझीलंडला हरवल्याने ग्रुप एमध्ये भारत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे आता सेमीफायनलमध्ये भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

Comments
Add Comment

Asia Cup 2025 : भारताचा सलग दुसऱ्या विजयासह सुपर-४ मध्ये प्रवेश; जपानवर मात

पाटणा : भारतीय संघाने आशिया कप हॉकी स्पर्धेच्या सुपर-४ मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. रंगतदार लढतीत भारतीय

रोहित शर्मासह ६ क्रिकेटपटूंची सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस चाचणी होणार

बंगळुरु : रोहित शर्मा, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर

टी-२० विश्वचषक २०२६ साठी महेंद्रसिंग धोनी पुन्हा टीम इंडियाचा 'मेंटॉर'? बीसीसीआयने दिली ऑफर!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी टीम इंडियाच्या मेंटरपदाची

Asia Cup 2025 च्या सामन्यांच्या वेळेत बदल! भारत-पाकिस्तान सामना आता कधी सुरू होणार?

नवी दिल्ली: आगामी आशिया कप २०२५ सुरू होण्याआधीच क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. या स्पर्धेतील

राहुल द्रविडचा धक्कादायक निर्णय! राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकपदाचा तडकाफडकी राजीनामा

नवी दिल्ली: भारताचा दिग्गज क्रिकेटपटू, माजी प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच थांबला

पॅरिस : भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूचे जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप