IND vs NZ: वरूणचा जोरदार 'पंच', भारताने न्यूझीलंडला हरवले

दुबई: वरूण चक्रवर्तीने मारलेल्या जोरदार पंचमुळे भारताने न्यूझीलंडला हरवले आहे. यासोबतच सेमीफायनलमध्ये आता भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारताने न्यूझीलंडला विजयासाठी २५० धावांचे आव्हान दिले होते. मात्र वरूणच्या माऱ्यासमोर किवी संघ पूर्णपणे ढेपाळला. वरूणच्या भेदक माऱ्यामुळे न्यूझीलंडला केवळ २०५ धावाच करता आल्या आणि न्यूझीलंड संघाचा ४४ धावांनी पराभव झाला.


या सामन्यात केन विल्यमसन्सने ८१ धावांची खेळी करत संघाला पराभवापासून रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला इतर कोणाचीही अपेक्षित साथ न लाभल्याने न्यूझीलंडचा पराभव झाला.वरूणने या संपूर्ण सामन्यात ५ विकेट घेतल्या. तर कुलदीप यादवने २ आणि हार्दिक पांड्या, अक्षऱ पटेल, रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


तत्पूर्वी, भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २४९ धावा केल्या होत्या. रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी फटाफट बाद झाली. त्यानंतर आलेला विराट कोहलीही फ्लॉप ठरला. त्याने केवळ ११ धावा केल्या. भारताने ३० धावांमध्ये आपले ३ फलंदाज गमावले होते.


त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांची जोडी क्रीझवर जमली. श्रेयसने ७९ धावा केल्या. तर अक्षर पटेलने ४२ धावांची खेळी केली. लोकेश राहुल २३ धावा करून परतला. हार्दिक पांड्याने ४५ धावा ठोकल्या. रवींद्र जडेजाला १६ धावा करता आल्या. मोहम्मद शमीने ५ धावा केल्या.


भारताने न्यूझीलंडला हरवल्याने ग्रुप एमध्ये भारत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे आता सेमीफायनलमध्ये भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

Comments
Add Comment

IND vs PAK: आम्ही टीम इंडियालाही हरवू शकतो...बांगलादेशला हरवल्यानंतर पाकच्या कर्णधाराने दिले चॅलेंज

दुबई: आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताचा सामना करण्यासाठी पाकिस्तानचा संघ सज्ज झाला आहे. बांगलादेशचा ११

Asis Cup 2025: आशिया कपच्या ४१ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार आहे हे...भारताविरुद्ध खेळणार हा संघ

दुबई: आशिया कप २०२५ च्या सुपर फोरमधील निर्णायक सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा ११ धावांनी पराभव करत अंतिम

बिग बॅश लीगमध्ये रविचंद्रन अश्विन सिडनी थंडरकडून खेळणार

कॅनबेरा : अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन बिग बॅश लीगच्या आगामी हंगामासाठी सिडनी थंडरकडून खेळणार आहे. या

वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई : वेस्ट इंडिज विरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघ जाहीर

India vs Bangladesh: अभिषेकचे धावांचे वादळ आणि भारताच्या गोलंदाजांचा मारा, बांग्लादेशला चारली पराभवाची धूळ

दुबई: अभिषेक शर्माची स्फोटक फलंदाजी आणि कुलदीप यादवच्या प्रभावी फिरकी माऱ्यामुळे भारताने आशिया कप २०२५ च्या

Asia cupमध्ये पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीत कायम

अबुधाबी : आशिया कप २०२५ च्या सुपर ४ सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला ५ विकेट्सने पराभूत करत अंतिम फेरीत