IND vs NZ: वरूणचा जोरदार 'पंच', भारताने न्यूझीलंडला हरवले

दुबई: वरूण चक्रवर्तीने मारलेल्या जोरदार पंचमुळे भारताने न्यूझीलंडला हरवले आहे. यासोबतच सेमीफायनलमध्ये आता भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारताने न्यूझीलंडला विजयासाठी २५० धावांचे आव्हान दिले होते. मात्र वरूणच्या माऱ्यासमोर किवी संघ पूर्णपणे ढेपाळला. वरूणच्या भेदक माऱ्यामुळे न्यूझीलंडला केवळ २०५ धावाच करता आल्या आणि न्यूझीलंड संघाचा ४४ धावांनी पराभव झाला.


या सामन्यात केन विल्यमसन्सने ८१ धावांची खेळी करत संघाला पराभवापासून रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला इतर कोणाचीही अपेक्षित साथ न लाभल्याने न्यूझीलंडचा पराभव झाला.वरूणने या संपूर्ण सामन्यात ५ विकेट घेतल्या. तर कुलदीप यादवने २ आणि हार्दिक पांड्या, अक्षऱ पटेल, रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


तत्पूर्वी, भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २४९ धावा केल्या होत्या. रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी फटाफट बाद झाली. त्यानंतर आलेला विराट कोहलीही फ्लॉप ठरला. त्याने केवळ ११ धावा केल्या. भारताने ३० धावांमध्ये आपले ३ फलंदाज गमावले होते.


त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांची जोडी क्रीझवर जमली. श्रेयसने ७९ धावा केल्या. तर अक्षर पटेलने ४२ धावांची खेळी केली. लोकेश राहुल २३ धावा करून परतला. हार्दिक पांड्याने ४५ धावा ठोकल्या. रवींद्र जडेजाला १६ धावा करता आल्या. मोहम्मद शमीने ५ धावा केल्या.


भारताने न्यूझीलंडला हरवल्याने ग्रुप एमध्ये भारत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे आता सेमीफायनलमध्ये भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

Comments
Add Comment

पावसामुळे पाचवा सामना रद्द, भारताने टी-२० मालिका २-१ ने जिंकली

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताच्या

आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने मांडला आशिया कपचा मुद्दा, समस्येवर मार्ग काढण्यासाठी समितीची स्थापना

मुंबई : भारताने आशिया चषक २०२५ जिंकला पण विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला ट्रॉफी मिळाली नाही. भारतीय संघाने आशियाई

ब्रिस्बेनच्या गाबावर रंगणार अखेरचा T20 सामना, भारत मारणार का बाजी ?

ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा अर्थात

पावसाच्या खेळात भारताचा दणदणीत विजय! पाकिस्तानला अवघ्या २ धावांनी लोळवले

मोंग कोक : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना रोमांचक

विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी

विश्वचषक विजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचाही राज्य सरकारकडून विशेष गौरव! जेमिमा, स्मृती आणि राधा यादव यांना प्रत्येकी २.२५ कोटी!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.