पुढील पाच वर्षात प्रदूषणविरहित स्मशानभूमी करण्याचे मुंबई पालिकेचे धोरण

  51

मुंबई: आगामी ५ वर्षांमध्ये प्रदूषणविरहित स्मशानभूमी करण्याची योजना मुंबई महापालिकेने आखली आहे. ही माहिती बृहन्मुंबई महापालिकेचे पर्यावरण विभागाचे उपायुक्त राजेश ताम्हाणे यांनी दिली. मुंबईतील प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेचे कान टोचले होते. त्यानंतर पालिकेने हा निर्णय घेतला आहे.


संपूर्ण मुंबईमध्ये एकूण २६३ स्मशानभूमी आहेत. यातील २२५ स्मशानभूमीमध्ये पारंपारिक लाकडांचा वापर केला जाते. १० स्मशानभूमी विद्युत दाहिन्या आहेत. तर १८ स्मशानभूमींमध्ये गॅसदाहिनी आहेत. सोबतच २२५ लाकडी स्मशानांपैकी १४ स्मशानांमध्ये ब्रिकेट्स बायोमासचा इंद म्हणून वापर करण्याचा विचार मुंबई महापालिका कत आहे. यामुळे प्रदूषणात घट होऊ शकते असा दावा पालिकेने केला आहे. तसेच यामुळे लाकडांचीही बचत होऊ शकते.


स्मशानभूमीमध्ये जेव्हा एका मृतदेहाला अग्नी दिला जातो त्यावेळेस साडेतीनशे ते चारशे किलो लाकडे जाळावी लागतात. दरम्यान, बायोमासच्या वापरामुळे केवळ शंभर ते दीडशे किलो लाकूड वापरला जाईल. यामुळे २०० ते ३०० किलो लाकडाची बचत होईल.


काही दिवसांपूर्वी मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांना आता तंदूर रोटी बनवण्यासाठी तंदूर कोळसा भट्टीचा वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने कोळसा भट्टी आणि लाकडी ओव्हनद्वारे स्वयंपाक करण्यास बंदी घातली आहे.

Comments
Add Comment

Gold Smuggling: मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई... १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने जप्त!

मुंबई: कस्टम विभागाच्या पथकाने मुंबई विमानतळावरून एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून १ कोटी

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ९ महत्वाचे निर्णय !

विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांची कार्यपद्धती प्रभावीरित्या

न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ, जरांगे मुंबईत येणार की नाही येणार लवकरच ठरणार

मुंबई : फडणवीस सरकारच्या निर्देशानुसार मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात झाली. उपसमितीचे

'अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे'

मुंबई : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील

'दिवेआगरच्या सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकर सुरू करा'

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील प्रस्तावित १४ कोटी रु.ची तरतुद असलेल्या सुपारी संशोधन केंद्राचे काम

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय महाविद्यालय उभारण्याची योजना

मुंबई : मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, मौजे सौंदाळे, जामसंडे येथे शासकीय