पुढील पाच वर्षात प्रदूषणविरहित स्मशानभूमी करण्याचे मुंबई पालिकेचे धोरण

  44

मुंबई: आगामी ५ वर्षांमध्ये प्रदूषणविरहित स्मशानभूमी करण्याची योजना मुंबई महापालिकेने आखली आहे. ही माहिती बृहन्मुंबई महापालिकेचे पर्यावरण विभागाचे उपायुक्त राजेश ताम्हाणे यांनी दिली. मुंबईतील प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेचे कान टोचले होते. त्यानंतर पालिकेने हा निर्णय घेतला आहे.


संपूर्ण मुंबईमध्ये एकूण २६३ स्मशानभूमी आहेत. यातील २२५ स्मशानभूमीमध्ये पारंपारिक लाकडांचा वापर केला जाते. १० स्मशानभूमी विद्युत दाहिन्या आहेत. तर १८ स्मशानभूमींमध्ये गॅसदाहिनी आहेत. सोबतच २२५ लाकडी स्मशानांपैकी १४ स्मशानांमध्ये ब्रिकेट्स बायोमासचा इंद म्हणून वापर करण्याचा विचार मुंबई महापालिका कत आहे. यामुळे प्रदूषणात घट होऊ शकते असा दावा पालिकेने केला आहे. तसेच यामुळे लाकडांचीही बचत होऊ शकते.


स्मशानभूमीमध्ये जेव्हा एका मृतदेहाला अग्नी दिला जातो त्यावेळेस साडेतीनशे ते चारशे किलो लाकडे जाळावी लागतात. दरम्यान, बायोमासच्या वापरामुळे केवळ शंभर ते दीडशे किलो लाकूड वापरला जाईल. यामुळे २०० ते ३०० किलो लाकडाची बचत होईल.


काही दिवसांपूर्वी मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांना आता तंदूर रोटी बनवण्यासाठी तंदूर कोळसा भट्टीचा वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने कोळसा भट्टी आणि लाकडी ओव्हनद्वारे स्वयंपाक करण्यास बंदी घातली आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis on Mumbai Kabutar Khana : "कबुतरखाने अचानक बंद करू नका", कबुतरांना खुराक देण्याची जबाबदारी बीएमसीचीच...फडणवीसांची सूचना

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने शहरातील कबुतरखान्यांवर कठोर कारवाई सुरू केली होती.

Dattatray Bharane : दत्तात्रय भरणे कृषीमंत्री पदावर; "राज्यात विविध भागांमध्ये फिरा, मी पाठीशी"...फडणवीसांच आश्वासन

‘शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणार, निर्णय घेणार’ : मंत्री दत्तात्रय भरणे मुंबई : विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना

कोल्हापूरकरांनो तयार राहा! महादेवी हत्तीणींसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, आनंदवार्ता कुठल्याही क्षणी!

मुंबई : कोल्हापूरच्या जनतेसाठी एक दिलासादायक घडामोड समोर येत आहे. मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Kabutar Khana : "१००% टॅक्स लावा, आम्ही तयार!", कबुतरखान्यासाठी गुजराती-जैन समाज आक्रमक!

मुंबई : मुंबईत विविध ठिकाणी असलेले कबूतरखाने बंद करण्याच्या मुद्यावरून सध्या चांगलाच वाद पेटला आहे.

Khalid Ka Shivaji : शिवरायांचा वापर करून फूट पाडण्याचा डाव? 'खालिद का शिवाजी' विरोधात हिंदुत्ववाद्यांचा प्रचंड रोष

मुंबई : 'शिवराय' म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. शिवरायांच्या नावाचा वापर करून समाजात फूट पाडण्याचा डाव रचला

Devendra Fadanvis : फडणवीसांचा निशिकांत दुबेनां थेट सल्ला, “आम्ही सक्षम आहोत, वक्तव्यांपूर्वी विचार करा!”

मुंबई : मराठी विरुद्ध हिंदी या वादावर पुन्हा एकदा पेटलेलं राजकारण आता चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. भाजपचे