पुढील पाच वर्षात प्रदूषणविरहित स्मशानभूमी करण्याचे मुंबई पालिकेचे धोरण

  32

मुंबई: आगामी ५ वर्षांमध्ये प्रदूषणविरहित स्मशानभूमी करण्याची योजना मुंबई महापालिकेने आखली आहे. ही माहिती बृहन्मुंबई महापालिकेचे पर्यावरण विभागाचे उपायुक्त राजेश ताम्हाणे यांनी दिली. मुंबईतील प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेचे कान टोचले होते. त्यानंतर पालिकेने हा निर्णय घेतला आहे.


संपूर्ण मुंबईमध्ये एकूण २६३ स्मशानभूमी आहेत. यातील २२५ स्मशानभूमीमध्ये पारंपारिक लाकडांचा वापर केला जाते. १० स्मशानभूमी विद्युत दाहिन्या आहेत. तर १८ स्मशानभूमींमध्ये गॅसदाहिनी आहेत. सोबतच २२५ लाकडी स्मशानांपैकी १४ स्मशानांमध्ये ब्रिकेट्स बायोमासचा इंद म्हणून वापर करण्याचा विचार मुंबई महापालिका कत आहे. यामुळे प्रदूषणात घट होऊ शकते असा दावा पालिकेने केला आहे. तसेच यामुळे लाकडांचीही बचत होऊ शकते.


स्मशानभूमीमध्ये जेव्हा एका मृतदेहाला अग्नी दिला जातो त्यावेळेस साडेतीनशे ते चारशे किलो लाकडे जाळावी लागतात. दरम्यान, बायोमासच्या वापरामुळे केवळ शंभर ते दीडशे किलो लाकूड वापरला जाईल. यामुळे २०० ते ३०० किलो लाकडाची बचत होईल.


काही दिवसांपूर्वी मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांना आता तंदूर रोटी बनवण्यासाठी तंदूर कोळसा भट्टीचा वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने कोळसा भट्टी आणि लाकडी ओव्हनद्वारे स्वयंपाक करण्यास बंदी घातली आहे.

Comments
Add Comment

कर्करोग ग्रस्त आजीला नातवाने कच-याच्या ढिगा-याजवळ फेकले

माणुसकीला, कौटुंबिक नात्याला काळीमा फासणारी घटना मुंबई : माणुसकीला आणि कौटुंबिक नात्यांना काळिमा फासणारी

कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा, लहान होड्यांना समुद्रात न जाण्याचा सूचना

मुंबई : कोकण किनारपट्टीला २३ जून सायंकाळी ५.३० वाजल्यापासून दिनांक २५ जून २०२५ रोजीचे रात्री ८.३० वाजेपर्यंत

Accident News: वर्सोवा खाडीत तेलाचा टँकर कोसळला, चालकाचा बुडून मृत्यू

मुंबई अहमदाबाद महामार्गावर पुलाची संरक्षक भिंत तोडून भीषण अपघात भाईंदर: मुंबई अहमदाबाद महामार्गावरून

PropEquity : जून-एप्रिल तिमाहीत घरांच्या विक्रीत १९% घट, सर्वाधिक घट ठाणे, मुंबईत!

प्रतिनिधी: प्रॉपइक्विटी(PropEquity) या कंपनीने घरांच्या विक्रीबाबत एक नुकताच अहवार सादर केला आहे. या अहवालातील

एसटी महामंडळ आज श्वेतपत्रिका जाहीर करणार

मुंबई : प्रचंड तोट्यात असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून श्वेतपत्रिका सोमवारी (दि. २३ जून) जाहीर

मंत्री नितेश राणे यांनी केली वर्सोवा जेट्टीची पाहणी

स्थानिक मासेमार बांधवांच्या विविध मागण्यांसाठी नितेश राणे यांची सकारात्मक भूमिका मुंबई : मत्स्य व्यवसाय व