IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा 'रेस्ट फॉर्म्युला'

  72

मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध ६ विकेटनी विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानला ६ विकेटनी हरवले. सलग दोन विजय मिळवत भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. भारतीय संघ आपला सेमीफायनलचा सामना ४ मार्चला दुबईत खेळणार आहे. दरम्यान, त्यांचा सामना कोणाशी असेल हे रविवार २ मार्चला ठरेल.



न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहित बाहेर?


२ मार्चला भारतीय संघ दुबईत आपला शेवटचा साखळी सामना खेळत आहे. सेमीफायनलच्या आधी हा सामना भारतीय संघासाठी सरावापेक्षा कमी नसेल. या सामन्यात भारतीय संघात बदल पाहायला मिळू शकतो.

मिडिया रिपोर्टनुसार, शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्ध नेतृत्व करू शकतो. तर रोहित शर्माला विश्रांती दिली जाऊ शकते. रोहितला पाकिस्तानविरुद्ध सामन्यात दुखापतीचा त्रास जाणवला होता. अशातच रोहित सेमीफायनलच्या आधी थोडा आराम करताना दिसेल.

शुभमन गिल बुधवारी सरावासाठी आला नव्हता. दरम्यान, गुरूवारी तो नेट्सवर परतला आणि नेट्समध्ये त्याने बराच वेळ सराव केला. जर रोहित शर्माला न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात आराम दिला तर ऋषभ पंत अथवा वॉशिंग्टन सुंदरला प्लेईंग ११मध्ये सामील केले जाऊ शकते.ऋषभला इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
Comments
Add Comment

IND vs ENG: पावसामुळे खेळ थांबला, इंग्लंड विजयापासून ३५ धावा दूर तर भारताला हव्यात ४ विकेट

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर खेळवला जात आहे. आज सामन्याचा चौथा दिवस

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र