ATM robbers : दुस-यांदा एटीएम फोडणारे मध्य प्रदेशातून झाले पसार?

एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांच्या शोधात पोलीस 'एमपी' पर्यंत पोहचले


अमरावती : तिवसा शहरात महामार्गावर असलेले एटीएम फोडून ४ लाख ८० हजारांची रोख लंपास केली. त्यानंतर चोरट्यांनी (ATM robbers) एटीएम जाळून टाकले. या चोरट्यांच्या शोधासाठी ग्रामीण पोलिसांचे पाच पथक कार्यरत आहे. या पथकांनी आतापर्यंत सुमारे ७० ते ८० ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. यामधून चोरट्यांनी पांढऱ्या रंगाची कार वापरल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून, चोरटे मध्य प्रदेश मार्गे समोर पळाल्याचा संशय आहे. त्यामुळे ग्रामीण पोलीस तिसऱ्या दिवशी मध्य प्रदेशापर्यंत पोहोचले आहेत.



चोरट्यांनी वापरलेली संशयित कार वरूड मार्गे मध्य प्रदेशात पोहोचल्याचा अंदाज


ग्रामीण पोलिसांच्या पथकाने (ATM robbers) वरुड, नागपूर या दोन्ही मार्गे असलेले सीसीटीव्ही तपासले आहेत. चोरट्यांनी वापरलेली संशयित कार वरूड मार्गे मध्य प्रदेशात पोहोचल्याचा अंदाज आहे. त्याच आधारे गुरुवारी (दि. २७) एलसीबीचे दोन पथक मध्य प्रदेशात पोहोचले आहे. बैतुलमध्येही एका ठिकाणी कार सीसीटीव्हीत दिसली मात्र कोणत्याही सीसीटीव्हीमध्ये कारचा क्रमांक कैद झाला नाही. त्यामुळे कार कुठली आहे किंवा चोरटे कुठले आहेत, याबाबत ठोस माहिती पोलिसांना अद्याप प्राप्त झाली नाही.



मागील वर्षीही तिवसा येथील हेच एटीएम चोरट्यांनी फोडले होते


दरम्यान मागील वर्षीही तिवसा येथील हेच एटीएम चोरट्यांनी (ATM robbers) फोडले होते. ते चोरटेही वरुड, मध्य प्रदेश मार्गेच हरियाणाला गेले होते. ते चोरटे हरियाणाचे होते. मात्र त्या टोळीतील एकच चोरटा आणि चोरट्यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेल्या कारचा मालक असे दोघेच पोलिसांच्या हाती आले होते. पुन्हा त्याच भागातील चोरट्यांनी ही चोरी केली आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली