Mill Worker House Update : राज्य शासनाचे गिरणी कामगारांना मुंबईबाहेर पाठवण्याचे धोरण

मुंबई : म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींनी आणि संक्रमण शिबिरांनी मराठी माणसाला जसे बेघर केले, तसे मुंबईतील बंद गिरण्यांनीही या मराठी माणसाला आश्रयाची जागाच ठेवली नाही. हे गिरणी कामगार आणि मुंबईकरांचे भूषण ठरलेले डबेवालेही आता मुंबईबाहेर फेकले गेलेत. दादर, भायखळा, लोअर परळ, वरळी, चिंचपोकळी, इत्यादी ठिकाणी कापड गिरण्या होत्या. या गिरण्या बंद झाल्यानंतर त्याच ठिकाणी गिरणी कामगारांना घरे द्यावीत, अशी मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे.



म्हाडाने विविध सोडतींमधून १३ हजार ४५३ गिरणी कामगारांना मुंबईत स्वान, अपोलो, एलफिन्स्टन, कोहिनूर, स्वदेशी, मुंबई, पिरामल, गोकुळदास, बॉम्बे डाईंग २७, २८ आणि श्रीनिवास या गिरण्यांच्या जागेवर घरे दिली आहेत; गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईत जागा शिल्लक नसल्याचे १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. आजही हजारो गिरणी कामगार घरांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यासाठी मुंबईबाहेर शेलू येथे ३० हजार आणि वांगणी येथे ५१ हजार घरे बांधली जात आहेत. ही घरे साडे नऊ लाखांत दिली जात आहेत. त्यासाठी १६ हजार रुपये हप्ता फेडावा लागेल. घराचे भाडे मात्र ३ हजार रुपयेच येईल. ही गिरणी कामगारांची फसवणूक आहे. यामुळे लाखभर गिरणी कामगार मुंबईबाहेर फेकला जातोय, अशी भावना 'गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समिती'चे अध्यक्ष आनंद मोरे यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र