प्रयागराज महाकुंभमेळ्यात धावल्या विक्रमी १७ हजार गाड्या

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौतुक


प्रयागराज (वृत्तसंस्था): रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सकाळी प्रयागराजला भेट दिली आणि महाकुंभमेळ्यासाठी भारतीय रेल्वेच्या व्यापक तयारीचा स्वतः आढावा घेतला. या भव्य धार्मिक कार्यक्रमाचे महत्व ओळखून, त्यांनी उत्तर मध्य रेल्वे , ईशान्य रेल्वे आणि उत्तर रेल्वे अंतर्गत विविध स्थानकांना भेट देऊन त्यांच्या कामकाजाचे मूल्यांकन केले. या वेळी त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांशी संवाद साधला .


रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी विविध विभागांमधील अखंड समन्वयाचे कौतुक केले आणि सर्व यात्रेकरूंसाठी सुरक्षित, कार्यक्षम आणि आरामदायी प्रवास सुलभ दिल्याबद्दल भारतीय रेल्वेच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. संपूर्ण कार्यक्रमात माननीय पंतप्रधानांनी दिलेल्या सतत मार्गदर्शनाबद्दल रेल्वेमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले आणि यात्रेकरूंच्या अभूतपूर्व संख्येने मदत केल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि शेजारील राज्यांच्या सरकारांचेही आभार मानले. रेल्वे कर्मयोगींच्या उत्कृष्ट समर्पणाचे रेल्वेमंत्र्यांनी कौतुक केले. त्यांच्या भेटीदरम्यान, रेल्वेमंत्र्यांनी अशा कार्यक्रमाचे व्यवस्थापन करण्यात भूमिका बजावणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांमधील प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिकरित्या भेट घेतली आणि त्यांचे कौतुक केले.


प्रवाशांना मदत करणाऱ्या आघाडीच्या कर्मचाऱ्यांपासून सुरक्षा सुनिश्चित करणाऱ्या आरपीएफ, जीआरपी आणि पोलिस कर्मचाऱ्यांपर्यंत, रेल्वेचे सुरळीत कामकाज करणाऱ्या अभियंत्यांपासून ते स्वच्छता कर्मचाऱ्यांपर्यंत, वैद्यकीय मदत देणाऱ्या डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांपासून ते हेल्प डेस्क अधिकाऱ्यांपर्यंत आणि प्रवासाची सोय करणाऱ्या बुकिंग कर्मचाऱ्यांपर्यंत - सर्वांच्या योगदानाचे कौतुक केले.


यावेळी त्यांनी टीटीई, चालक , सह चालक , सिग्नल आणि टेलिकॉम कर्मचारी, टीआरडी आणि इलेक्ट्रिकल टीम, एएसएम, कंट्रोल ऑफिसर्स, ट्रॅकमन आणि रेल्वे अधिकाऱ्यांचेही आभार मानले.


भारतीय रेल्वेने महाकुंभ साठीच्या नियोजित केलेल्यापेक्षा जास्त रेल्वेसेवा प्रदान केल्या. या काळात एकूण १७ हजार १५२ गाड्या चालवण्यात आल्या, जे नियोजित १३,००० गाड्यांपेक्षा जास्त होत्या. यात गेल्या कुंभमेळ्याच्या तुलनेत चार पटवाढ झाली. यामध्ये ७ हजार ६६७ विशेष गाड्या आणि ९ हजार ४८५ नियमित गाड्यांचा समावेश होता, ज्यामुळे भाविकांना सुरळीत आणि कार्यक्षम प्रवास करता आला. एकूण ६६ कोटी यात्रेकरू महाकुंभात सहभागी झाले होते.


मोठ्या संख्येने येणाऱ्या यात्रेकरूंना सेवा देण्यासाठी भारतीय रेल्वेने प्रयागराजमधील नऊ प्रमुख स्थानकांवर व्यापक पायाभूत सुविधा उभारल्या, ज्यामध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी दुसरा प्रवेशद्वार, ४८ फलाट आणि २१ पादचारी पूल बांधण्यात आले. गर्दी नियंत्रित करण्यासाठी फेशियल रेकग्निशन टेक्नॉलॉजीआणि ड्रोन पाळत ठेवण्यासह १ हजार १८६ सीसीटीव्ही कॅमेरे वापरून देखरेख मजबूत करण्यात आली.

Comments
Add Comment

Parth Pawar Rajya Sabha MP Oath : गुलाबी जॅकेट अन् डोळ्यांवर चष्मा...हुबेहूब अजित दादा! पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड आज देशाच्या राजधानीत पाहायला मिळाली. दिवंगत अजित

Trending News : कमळाच्या देठातून श्वास घेत 5 तास लपला; सराईत चोरटा अखेर सापडला

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका चोरट्याला पकडण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) राबवलेली कारवाई अत्यंत थरारक ठरली.

Amazon Layoffs : ॲमेझॉनमध्ये पुन्हा नोकर कपातीची टांगती तलवार; १४,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर ई-कॉमर्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये मक्तेदारी निर्माण करणारी कंपनी ॲमेझॉन (Amazon)

Ancient manuscripts : प्राचीन हस्तलिखिते मिळणार आता एका क्लिकवर

'ज्ञानभारतम्' मोहिमेला प्रारंभ; हस्तलिखितांच्या नोंदीसाठी पुणे-नागपूर मुख्य केंद्र मुंबई : भारताच्या प्राचीन

Ahmedabad Toodler Death : डोशाच विषारी पीठ की जाणीवपूर्व केलेला विषप्रयोग ? पोलिसांचा संशय बळावला

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा येथे झालेल्या दुहेरी मृत्यूने सर्वाना धक्का बसला आहे. एकाच

Subansiri News : महागड्या विजेचा फटका: आसाम आणि मेघालयचा सुबनसिरी प्रकल्पातील अतिरिक्त वीज घेण्यास नकार

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी जलविद्युत योजना असलेल्या २००० मेगावॅट क्षमतेच्या 'लोअर सुबनसिरी' (Subansiri Lower HEP)