मढ, वर्सोवा पुलामुळे १०८ हेक्टर कांदळवनाची जागा बाधित

चंद्रपुरात केले जाणार पर्यायी वनीकरण


मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या वर्सोवा ते मिरा रोड भाईंदरपर्यंतच्या विस्तारीत सागरी किनारा मार्ग अर्थात कोस्टल रोड आणि मढ वर्सोवा पूलांच्या कामांमध्ये तब्बल १०८ हेक्टर कांदळवनाची जमिनी बाधित होत आहे. या कांदळवनाची जमिनी बाधित होत असल्याने चंद्रपूरमधील जागेमध्ये याचे पर्यायी वनीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.


मुंबई महापालिकेच्या वतीने प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी दरम्यानच्या मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) शेवटच्या टप्प्यात असून आता वर्सोवा ते दहिसर आणि पुढे मिरा रोड भाईंदर या कोस्टल रोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यात वर्सोवा ते दहिसर या कोस्टल रोड प्रकल्पाचे सहा टप्यात काम हाती घेत कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. या सहा टप्प्यातील कामासाठीच जीएसटीसह १८,२६९.७७ कोटी रुपये आणि विविध करासह ही रक्कम ३६,०९५.१९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या प्रकल्पांतर्गत मार्गरेषेने बाधित होणारी जमिन ही कांदळवन, खाडी व नैसर्गिक क्षेत्र तसेच अस्तित्वातील रस्त्यामधुन जाते.


तसेच महापालिकेच्यावतीने वर्सोवा ते मढ या सागरी पूलाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाची मार्ग रेषा ही विद्यमान रस्ता, विकास नियोजन रस्ता, कांदळवन, खाडी इत्यादीने बाधित होत असल्याने महाराष्ट़ सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण, वन विभाग, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आदींची परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे.


त्यामुळे कोस्टल रोड तसेच मढ आणि वर्सोवा या पूलाच्या बांधकामासाठी कांदळवन आणि खाडीची जागा बाधित होत असून या दोन्ही प्रकल्पांमुळे सुमारे १०८ हेक्टर जागा बाधित होत असून या बाधित होणाऱ्या कांदळवनाऐवजी पर्यायी वनीकरणासाठी चंद्रपूरमधील जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे या जागेचे मुल्यांकन झाल्यानंतर चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे याच्या जमिनीच्या मुल्याची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

मुंबईत आता जलवाहिनी दुरुस्तीच्या काळात होणार नाही पाणीकपात, महापालिकेने असे घेतले हाती काम...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनींमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्तीच्या काळामध्ये

भारत सागरी सप्ताह २०२५ मध्ये ५५,९६९ कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार

भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सहकारातून समृद्धी आणणार: मंत्री अमित शाह

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत दोन मोठ्या नौकांचे सहकारी संस्थांना वितरण मुंबई : सहकाराच्या माध्यमातून

भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी कार्यालय हे मंदिरासमान

भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाचे अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन मुंबई : भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी

केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या छोट्या बच्चूंसाठी गायिका डॉ अनुराधा पौडवाल यांनी दिला असा मदतीचा हात...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक अर्थात केईएम रुग्णालयासाठी आता विख्यात गायिका

एसबीआयकडून मोठ्या प्रमाणावर भरती: ३,५०० अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती

मुंबई : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया' (SBI) आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि