मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी चेहरे ओळखणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार

मुंबई : गर्दीच्या ठिकाणी फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे अर्थात चेहरे ओळखणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. यासाठी मुंबई पोलिसांनी निवडक जागा निश्चित केल्या असल्याचे वृत्त आहे. या ठिकाणी रस्त्यावरील प्रत्येक घडामोडीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लक्ष असेल. या आधुनिक कॅमेऱ्यांच्या मदतीने गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहेत.



सध्या मुंबईत जिथे व्हीआयपी, सेलिब्रेटी यांचा वावपर मोठ्या प्रमाणात आहे, अशा निवडक ठिकाणी फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे अर्थात चेहरे ओळखणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरुवात झाली आहे. या कॅमेऱ्याचे फायदे लक्षात येताच मुंबई पोलिसांनी निवडक गर्दीच्या जागांवर फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे अर्थात चेहरे ओळखणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.



फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे हरवलेल्या व्यक्तींना शोधणे, वाँटेड गुन्हेगारांना पकडणे ही कामं सोपी होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. कॉम्प्युटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या मदतीने काम करणारे सॉफ्टवेअर वापरुन चेहरे ओळखण्याची प्रक्रिया कमालीची वेगवान केली जाईल. मुंबईत निवडक गर्दीच्या ठिकाणी फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी एक प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी मुंबई पोलिसांच्यावतीने राज्य शासनाला सादर केला जाणार. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील