मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी चेहरे ओळखणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार

मुंबई : गर्दीच्या ठिकाणी फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे अर्थात चेहरे ओळखणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. यासाठी मुंबई पोलिसांनी निवडक जागा निश्चित केल्या असल्याचे वृत्त आहे. या ठिकाणी रस्त्यावरील प्रत्येक घडामोडीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लक्ष असेल. या आधुनिक कॅमेऱ्यांच्या मदतीने गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहेत.



सध्या मुंबईत जिथे व्हीआयपी, सेलिब्रेटी यांचा वावपर मोठ्या प्रमाणात आहे, अशा निवडक ठिकाणी फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे अर्थात चेहरे ओळखणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरुवात झाली आहे. या कॅमेऱ्याचे फायदे लक्षात येताच मुंबई पोलिसांनी निवडक गर्दीच्या जागांवर फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे अर्थात चेहरे ओळखणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.



फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे हरवलेल्या व्यक्तींना शोधणे, वाँटेड गुन्हेगारांना पकडणे ही कामं सोपी होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. कॉम्प्युटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या मदतीने काम करणारे सॉफ्टवेअर वापरुन चेहरे ओळखण्याची प्रक्रिया कमालीची वेगवान केली जाईल. मुंबईत निवडक गर्दीच्या ठिकाणी फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी एक प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी मुंबई पोलिसांच्यावतीने राज्य शासनाला सादर केला जाणार. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता