मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी चेहरे ओळखणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार

मुंबई : गर्दीच्या ठिकाणी फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे अर्थात चेहरे ओळखणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. यासाठी मुंबई पोलिसांनी निवडक जागा निश्चित केल्या असल्याचे वृत्त आहे. या ठिकाणी रस्त्यावरील प्रत्येक घडामोडीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लक्ष असेल. या आधुनिक कॅमेऱ्यांच्या मदतीने गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहेत.



सध्या मुंबईत जिथे व्हीआयपी, सेलिब्रेटी यांचा वावपर मोठ्या प्रमाणात आहे, अशा निवडक ठिकाणी फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे अर्थात चेहरे ओळखणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरुवात झाली आहे. या कॅमेऱ्याचे फायदे लक्षात येताच मुंबई पोलिसांनी निवडक गर्दीच्या जागांवर फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे अर्थात चेहरे ओळखणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.



फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे हरवलेल्या व्यक्तींना शोधणे, वाँटेड गुन्हेगारांना पकडणे ही कामं सोपी होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. कॉम्प्युटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या मदतीने काम करणारे सॉफ्टवेअर वापरुन चेहरे ओळखण्याची प्रक्रिया कमालीची वेगवान केली जाईल. मुंबईत निवडक गर्दीच्या ठिकाणी फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी एक प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी मुंबई पोलिसांच्यावतीने राज्य शासनाला सादर केला जाणार. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
Comments
Add Comment

Mumbai News : एकाच दिवशी मुंबईत २७ हजार ८६६ महिलांच्या कर्करोगाची तपासणी

मुंबईत २९८ ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी राबवले महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी शिबिर आशिया बूक रेकॉर्ड

Driving Licence Rules : १ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्सचे कडक नियम लागू!

- ड्रायव्हिंग लायसन्स काढताय? हे नवीन नियम नक्की पाहा! मुंबई : तुम्हाला माहितीये का? महाराष्ट्रात ड्रायव्हिंग

Devendra Fadnavis : उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ'

मुंबई(Mumbai) : राज्य शासनाच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रभावी साथ

Ashadhi Wari Special Train : आषाढी वारीसाठी रेल्वेची मोठी भेट! CSMT–मिरज दरम्यान आणखी २ विशेष 'वन-वे' गाड्या; २३ जुलैपासून आरक्षण सुरू

मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी ४४ हजार कोटींच्या ‘अर्बन चॅलेंज फंड’ची अंमलबजावणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश; आधुनिक, स्वावलंबी शहरे घडविणार मुंबई(Mumbai) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Railone App : पश्चिम रेल्वेचे प्रवाशांना 'रेलवन' अॅप वापरण्याचे आवाहन

मुंबई : रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, स्मार्ट आणि डिजिटल करण्यासाठी पश्चिम रेल्वेने (Western Railway) प्रवाशांना