मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी चेहरे ओळखणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार

मुंबई : गर्दीच्या ठिकाणी फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे अर्थात चेहरे ओळखणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. यासाठी मुंबई पोलिसांनी निवडक जागा निश्चित केल्या असल्याचे वृत्त आहे. या ठिकाणी रस्त्यावरील प्रत्येक घडामोडीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लक्ष असेल. या आधुनिक कॅमेऱ्यांच्या मदतीने गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहेत.



सध्या मुंबईत जिथे व्हीआयपी, सेलिब्रेटी यांचा वावपर मोठ्या प्रमाणात आहे, अशा निवडक ठिकाणी फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे अर्थात चेहरे ओळखणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरुवात झाली आहे. या कॅमेऱ्याचे फायदे लक्षात येताच मुंबई पोलिसांनी निवडक गर्दीच्या जागांवर फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे अर्थात चेहरे ओळखणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.



फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे हरवलेल्या व्यक्तींना शोधणे, वाँटेड गुन्हेगारांना पकडणे ही कामं सोपी होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. कॉम्प्युटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या मदतीने काम करणारे सॉफ्टवेअर वापरुन चेहरे ओळखण्याची प्रक्रिया कमालीची वेगवान केली जाईल. मुंबईत निवडक गर्दीच्या ठिकाणी फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी एक प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी मुंबई पोलिसांच्यावतीने राज्य शासनाला सादर केला जाणार. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास