Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडल्यानंतर इंग्लंड संघात भूकंप

मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये इंग्लंड संघाची कामगिरी खास राहिलेली नाही. इंग्लंड संघ सलग दोन सामने हरल्याने ते सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. खराब कामगिरीनंतर जोस बटलरने वनडे आणि टी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बटलर १ मार्चला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचे नेतृत्व करताना दिसणार आहे.


जोस बटलरच्या नेतृत्वात इंग्लंडच्या संघाला अफगाणिस्तानला ८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. पराभवानंतर बटलरने नेतृत्व सोडण्याचे संकेत दिले होते. बटलरने म्हटले होते की, मी यावेळेस कोणतेही भावनिक विधान करणार नाही. मात्र मी आणि इतर खेळाडूंबाबत विचार करेन. आम्ही शक्यतांवर विचार करू. हे खूप निराशाजनक आहे. मला वाटले होते की आम्ही सामना जिंकू शकतो. आणखी एक शानदार सामना मात्र आम्ही हरलो.


 


आता जोस बटलरने मोठा निर्णय घेतला आहे. जोस बटलरच्या नेतृत्वात इंग्लंडच्या संघाला भारतात आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्डकप २०२३ आणि वेस्ट इंडिज-अमेरिका आयोजित टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये अपयश मिळाले होते.

Comments
Add Comment

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट

IND vs WI: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, पहिल्याच दिवशी विंडीजचा संपूर्ण डाव कोसळला

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र