बदलापूर - नवी मुंबई बोगदा २०२६ पासून कार्यरत होणार

बदलापूर : बदलापूर पूर्व ते नवी मुंबई हा बोगदा २०२६ पासून कार्यरत होणार आहे. या बोगद्यामुळे बदलापूर ते नवी मुंबई हा प्रवास फक्त २० मिनिटांत करता येईल. हा मार्ग बदलापूरमधील बेंडशील गावाला कल्याण तालुक्यातील रायतेशी जोडेल. यामुळे मुंबई, पालघर आणि पुढे गुजरातपर्यंत रस्ते मार्गाने वेगाने प्रवास करणे शक्य होणार आहे.



बोगद्यामुळे बदलापूरच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. रस्ते मार्गाने प्रवास वेगवान होणार असल्यामुळे बदलापूर आणि आसपासच्या परिसरात औद्योगिक क्षेत्राला तसेच गोदामांशी सेवांना चालना मिळण्याची शक्यता आहे. यातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाला गती मिळेल.

वडोदरा अर्थात बडोदा ते जेएनपीटी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू आहे. हा महामार्ग १२० मीटर रुंद आणि १८९ किलोमीटर लांबीचा, आठ लेनचा (मार्गिका) आहे आणि पूर्णत्वाच्या जवळ आहे. नवीन रस्त्यामुळे वडोदरा (बडोदा) आणि मुंबई दरम्यानच्या प्रवासाचा वेळ कमी होईल. वाहतुकीचा वेग वाढेल.

दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा लवकरच कार्यरत होणार असल्यामुळे नवी मुंबई आणि पनेवल पट्ट्यातील अर्थचक्राला गती येईल. या भागात उद्योगांना चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता