AUS vs AFG: पावसामुळे ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान सामना रद्द, ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये

लाहोर: लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये पावसामुळे ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. यासोबतच ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. हा सामना रद्द झाल्याने दक्षिण आफ्रिकेलाही फायदा मिळाला आहे. कारण त्यांचे सेमीफायनलमधील स्थान निश्चित झाले आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने पहिल्यांदा खेळताना २७३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कांगारूंचा संघ पूर्ण १३ षटकेही खेळू शकला नाही.


ऑस्ट्रेलिया संघाच्या १२.५ षटकांत १०९ धावा झाल्या असताना पावसाचा खेळ सुरू झाला. ट्रेविस हेडने तडाखेबंद खेळी साकारताना ५९ धावा आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने १९ धावा केल्या होत्या. पाऊस भारतीय वेळेनुसार साडेसात वाजण्याच्या सुमारास आला होता मात्र काही काळाने पाऊस थांबला मात्र दीड तासानंतरही ग्राऊंड स्टाफ मैदान पुन्हा खेळण्यासाठी तयार करू शकले नाहीत.


हा सामना रद्द झाल्याने अफगाणिस्तानला सर्वात मोठे नुकसान झाले आहे. रद्द झाल्याने त्यांना केवळ एक गुण मिळाला असून त्यांचे एकूण ३ गुण झालेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आता एकूण ४ गुणांसह ग्रुप बीमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक