अलिबाग एसटी आगाराबाहेर दोन एसटीचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, दुचाकी आणि रिक्षाला चिरडले!

नातेवाईकांनी फोडल्या बसच्या काचा


अलिबाग : अलिबाग एसटी स्थानकाच्या बाहेर (Alibaug ST depo) राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका दुचाकीस्वाराला आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी घटनास्थळी जोरदार राडा घातला.



दोन बसचा भीषण अपघात


मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग एसटी आगाराबाहेर दोन बसचा भीषण अपघात झाला. या बसच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी अपघातामध्ये मृत झालेल्या व्यक्तीचे नाव जयदीप बना असे आहे. या घटनेनंतर मृत्यू व्यक्तीच्या संतप्त नातेवाईकांनी अपघातग्रस्त एसटीच्या काचा फोडल्या. तसेच काही वेळ मयताच्या नातेवाईकांनी एसटी बस रोखून धरली होती. यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.



दोन बसच्यामध्ये तरुण मोटार सायकलसह अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू


अलिबाग एसटी आगाराबाहेर या दोन्ही एसटी बसची झालेली धडक इतकी जोरदार होती की, सदर अपघातात एका रिक्षेचेही नुकसान झाले आहे. दोन्ही बसेस अलिबाग बस स्थानकात शिरत असताना हा अपघात झाला. या दोन बसच्यामध्ये तरुण मोटार सायकलसह अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.



यामुळे अलिबाग एसटी आगाराबाहेर मोठा जमाव तयार झाला होता. या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांना जमावाला पांगवताना मोठी कसरत करावी लागली. या ठिकाणी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसंग्राम लढणार

मुंबई : मुंबई, ठाणे, भिवंडी आणि नवी मुंबई येथील शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत

पुण्यात राजगुरूनगरमध्ये कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्याचा मित्रावर चाकूने हल्ला; मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख मिरवणाऱ्या पुण्याची प्रतिमा वाढत्या गुन्हेगारीमुळे मलिन होऊ लागली आहे. ताजी

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९

खलनायक अक्षय खन्नाच्या भूमिकेचा जलवा, ‘धुरंधर’ने मोडले ‘छावा’-‘पुष्पा २’चे रेकॉर्ड

मुंबई : ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’नंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारा सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’. आदित्य धर

धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस