धर्म आणि अधर्म

जीवन संगीत - सद्गुरू वामनराव पै


निसर्गाचे नियम किती व कुठले हा प्रश्न आम्हाला नेहमी विचारण्यात येतो. क्रिया तशी प्रतिक्रिया, जिथे परिणाम आहे तिथे कारण हे असतेच, जसा विचार तसा जीवनाला आकार, गुरुत्वाकर्षण शक्तीचा नियम, बहिर्मनाचा नियम, अंतर्मनाचा नियम असे अनेक निसर्गाचे नियम आहेत. हे निसर्गाचे नियम आपण समजून घेत नाहीत म्हणून माणसाचे जीवन कधीच सुखी झालेले नाही. सुख पाहता जवापाडे दुःख पर्वताएवढे असे होते. याचे कारण एके ठिकाणी डॉ. मर्फी म्हणतात, “मानसिक आणि आध्यात्मिक नियमांचे अज्ञान”, म्हणजेच मनोआध्यात्मिक नियमांबद्दलचे अज्ञान. म्हणून मानसिक व आध्यात्मिक नियम जे आहेत ते आणि त्याचा संबंध निसर्ग नियमांशी कसा आहे हे समजून घेतले पाहिजे. हे नियम आणि निसर्गाचे नियम यांचा माणसाच्या जीवनाशी थेट संबंध आहे. माणसाचे विचार बिघडले की जीवन बिघडते, भावना बिघडल्या की, जीवन बिघडते, संकल्प बिघडले की जीवन बिघडते, इच्छा बिघडल्या की जीवन बिघडते.


हे सर्व जर पाहिले तर मानसिक व आध्यात्मिक नियमांचे ज्ञान हे माणसाचे जीवन सुरळीत चालण्यासाठी किती आवश्यक आहे हे लक्षात येते. हे कुणीही आतापर्यंत सांगितलेले नाही. आपल्याला सांगितले जाते की, आपल्या हातात काही नाही. देवाची कृपा होते किंवा देवाचा कोप होतो म्हणून दानधर्म करा, यज्ञयाग करा, उपासतापास करा अशा अनेक गोष्टी करायला सांगितल्या जातात. प्रत्यक्षात यांचा मानवी जीवनाशी तसा काही संबंध नाही. जीवनविद्येने सिद्धांत मांडला, धर्म अधर्म कशाला म्हणतात? निसर्गाचे नियम पाळणे हाच धर्म व निसर्गाचे नियम लाथाडणे हा अधर्म. किती सोपे करून टाकले. जगातील सर्व लोकांनी निसर्गाचे नियम पाळायचे ठरविले तर आनंदी आनंद आहे. आम्ही तर असे प्रतिपादन करतो की, अखिल मानवजातीसाठी धर्म एकच असतो, ज्याप्रमाणे समुद्र अखिल मानवजातीसाठी एकच आहे त्याप्रमाणे, हा धर्म म्हणजेच जीवन धर्म. निसर्गाचे नियम सर्वांना सारखे म्हणून यात तुमचा देव, आमचा देव हे कुठून येणार? या ज्ञानाचा
तुमच्या जीवनाशी अत्यंत घनिष्ट संबंध येतो. जीवनविद्येने हे तत्वज्ञान इतके सोपे केले व व्यावहारिक केले.

Comments
Add Comment

Ujjain Mahakaleshwar : महाकालच्या भक्तांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या घ्या भस्म आरतीचं दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनानं आपल्या आयुष्यातील संकटे आणि

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील महत्वाचा सण आहे. या सणापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. आणि गुडीपाडवा या

एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न !

धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन

कधी आहे पापमोचनी एकादशी ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ? कशी करावी या दिवशी पूजा ?

मुंबई : हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी. हा दिवस

कधी आहे नृसिंह द्वादशी ? त्या दिवशी नेमके काय करावे ?

भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा