IND vs PAK: क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर, भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा रंगणार सामना

मुंबई: क्रिकेट चाहत्यांसाठी एक खुशखबर समोर येत आहे. त्यांना या वर्षी पुन्हा एकदा भारतीय संघ आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला पाहण्याची संधी मिळणार आहे. दोन्ही संघादरम्यान नुकताच एक सामना झाला होता. हा सामना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ अंतर्गंत २३ फेब्रुवारीला झाला होता. यात भारतीय संघाने विजय मिळवला.


आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. या वर्षी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यात टक्कर होईल. हा सामना आशिया कप २०२५ अंतर्गत खेळवला जाईल. आशियाई क्रिकेट काऊंन्सिलने आशिया कपसाठी संभाव्य विंडो तयार केली आहे.


ही स्पर्धा या वर्षी सप्टेंबरमध्ये होऊ शकते. यावेळेस आशिया कप यूएईमध्ये होऊ शकतो. या स्पर्धेचे यजमानपद भारतच करणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत पाकिस्तानसोबत जे झाले ते पाहता एसीसीने आशिया कपसाठी न्यूट्रल ठिकाण ठरवले आहे. दरम्यान, अद्याप फायनल ठिकाण निश्चित नाही.



भारत-पाकिस्तान यांच्यात होणार ३ सामने?


हा आशिया कप २०२५मध्ये सर्व ८ संघादरम्यान फायनल सामन्यासह १९ सामने खेळवले जातील. भारत आणि पाकिस्तानशिवाय या स्पर्धेत श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान, यूएई, ओमान आणि हाँगकाँग यांचा समावेश असेल. सर्व संघांना २ ग्रुपमध्ये विभागले जाईल.

Comments
Add Comment

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या

कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना