IND vs PAK: क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर, भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा रंगणार सामना

  130

मुंबई: क्रिकेट चाहत्यांसाठी एक खुशखबर समोर येत आहे. त्यांना या वर्षी पुन्हा एकदा भारतीय संघ आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला पाहण्याची संधी मिळणार आहे. दोन्ही संघादरम्यान नुकताच एक सामना झाला होता. हा सामना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ अंतर्गंत २३ फेब्रुवारीला झाला होता. यात भारतीय संघाने विजय मिळवला.


आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. या वर्षी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यात टक्कर होईल. हा सामना आशिया कप २०२५ अंतर्गत खेळवला जाईल. आशियाई क्रिकेट काऊंन्सिलने आशिया कपसाठी संभाव्य विंडो तयार केली आहे.


ही स्पर्धा या वर्षी सप्टेंबरमध्ये होऊ शकते. यावेळेस आशिया कप यूएईमध्ये होऊ शकतो. या स्पर्धेचे यजमानपद भारतच करणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत पाकिस्तानसोबत जे झाले ते पाहता एसीसीने आशिया कपसाठी न्यूट्रल ठिकाण ठरवले आहे. दरम्यान, अद्याप फायनल ठिकाण निश्चित नाही.



भारत-पाकिस्तान यांच्यात होणार ३ सामने?


हा आशिया कप २०२५मध्ये सर्व ८ संघादरम्यान फायनल सामन्यासह १९ सामने खेळवले जातील. भारत आणि पाकिस्तानशिवाय या स्पर्धेत श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान, यूएई, ओमान आणि हाँगकाँग यांचा समावेश असेल. सर्व संघांना २ ग्रुपमध्ये विभागले जाईल.

Comments
Add Comment

व्हीआयपींच्या उपस्थितीत रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा संपन्न

लखनऊ : भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा लखनऊ येथील द

आज होणार क्रिकेटपटू रिंकू सिंहचा साखरपुडा

लखनऊ : भारतीय क्रिकेटर रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाची खासदार प्रिया सरोज यांचा साखपुडा आज म्हणजेच रविवार ८ जून

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.