Navi Mumbai Airport : नवी मुंबईकरांसाठी गुडन्यूज! विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर

नवी मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Navi Mumbai Airport) काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच हे विमानतळ प्रवाशांसाठी सज्ज होणार आहे. सोमवारी संयुक्त पथकाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली असून विमानतळ उद्घाटनाची तारीख देखील जारी केली आहे.



DGCA च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "मूल्यांकनादरम्यान, आम्हाला विमानतळ ऑपरेटरने कळवले की ते ५ मार्चपर्यंत सर्व आवश्यक असणारी परवानगी मिळविण्यासाठी अर्ज करतील". या सर्व तपासणीनंतर, आता विमानतळ ऑपरेटर नियमांनुसार विमानतळ परवान्यासाठी DGCA कडे अर्ज करतील. हे अर्ज १५ मे पासून सुरू होणाऱ्या फ्लाइट ऑपरेशनसाठी असणार आहे. त्यानंतर १५ मे पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा प्रवाशांसाठी सुरु होणार आहे.


दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरु होणार असल्यामुळे नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु झाल्यावर अनेक रिक्षा चालकांना रोजगाराची सुविधादेखील मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Navi Mumbai Airport)



काय आहेत वैशिष्टये?


नवी मुंबई विमानसेवा कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी हाताळेल अशी अपेक्षा आहे. सध्या ३.७ किमी धावपट्टी ऑपरेशनसाठी तयार आहे, लवकरच दुसरी धावपट्टी बांधण्याची योजना आहे. त्याचबरोबर भूमिगत मेट्रो द्रुतगती मार्ग, अटल सेतू पूल, बुलेट ट्रेन सेवा या बहुविध वाहतूक पर्यायांमुळे विमानतळ प्रवेशयोग्य होईल आणि प्रवाशांचा प्रवास वेळ देखील कमी होणार आहे.

Comments
Add Comment

BMC APP : रस्त्यांवर खड्डे दिवसात का? करा माय बीएमसी मार्ग ऍपवर तक्रार

Mumbai : नागरिकांच्या तक्रारींचे जलद व प्रभावी निवारण करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने या वर्षी ‘MyBMC MARG’

BMC : घरकाम करणाऱ्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी पालिकेचे 'अ‍ॅप' विकसित करा; महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षांची मागणी

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या महिला बचत गटातील सदस्यांना हक्काचा रोजगार

Industrial and commercial water usage : तरण तलाव, बांधकामांच्या ठिकाणच्या जलजोडण्या करणार खंडित

औद्योगिक व व्यावसायिक पाणी वापरात २० टक्के कपात मुंबई: पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून १०

Commissioner Dr. Ashwini Joshi : अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची बदली

प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नियुक्ती मुंबई  : मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची

Water Shortage : पाणीटंचाईचे सावट गडद

जलतरण तलाव व बांधकामांच्या जलजोडण्या खंडित ; उद्योगांना २० टक्के कपात मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन

Alternative Transport Hub : बोरिवली स्थानकावरील गर्दी कमी होणार; कांदिवलीचा 'पर्यायी वाहतूक केंद्र' म्हणून विकास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सर्वात वर्दळीचे स्थानक असलेल्या बोरिवली स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी