Bhootnii : संजय दत्तचा 'भूतनी' चित्रपटाचा टीझर रिलीज; 'या' तारखेला होणार प्रदर्शित!

मुंबई : अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) सोशल मीडियावर त्याच्या आगामी 'भूतनी' या चित्रपटाबद्दल अपडेट दिली आहे. संजय दत्त हा लवकरच एका हॉरर-कॉमेडी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.



संजय दत्तने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाविषयी माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये संजय दत्त भूतनीसोबत भांडताना दिसत आहे. चित्रपटाची घोषणा करत संजय दत्तने लिहिले की, 'या गुड फ्रायडेला घाबरण्यासाठी एक नवीन तारीख मिळाली आहे, FridayThe18th! यापूर्वी कधीही न पाहिलेल्या हॉरर, अ‍ॅक्शन आणि विनोदासाठी सज्ज व्हा. भूतनी १८ एप्रिलला चित्रपटगृहात धुमाकूळ घालणार. ' दरम्यान, टीजरमधील संजय दत्तचा लुक सर्वांच्या पसंतीस पडला आहे.


या आगामी चित्रपट भूतनीमध्ये संजय दत्तसह मौनी रॉय, पलक तिवारी आणि सनी सिंग महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. ही एक प्रेमकथा आहे. ज्यामध्ये मौनी रॉय भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझर पाहून, चित्रपटाविषयी उत्साह खूपच वाढला आहे.


संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच 'बागी 4' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये रिलीज केला जाणार आहे. याशिवाय तो 'हाऊसफुल 5' मध्ये देखील दिसणार आहे.


?si=9X2Xb6PRDetH9NQK
Comments
Add Comment

Bollywood Movies : ‘आखरी सवाल’चा पोस्टर रिलीज: संजय दत्त यांचा इंटेन्स अवतार ठरतोय चर्चेचा विषय

मुंबई : निर्माते निखिल नंदा आणि संजय दत्त यांच्या निखिल नंदा मोशन पिक्चर्स बॅनरखाली बनलेला ‘आखरी सवाल’ हा

Marathi Big Boss 6 Winner Tanvi Kolte : तंटा क्वीन ते टास्क क्वीन तन्वी कोलते ठरली मराठी बॉग बॉस सीझन ६ ची विजेती

मुंबई : मराठी बिग बॉसचा सीझन सुरु झाला, रितेश देशमुख यांनी या शो सूत्रसंचालन केलं, आणि बघता बघता या शोचा महाअंतिम

Sachin Pilgaonkar - Madhurani Gokhale : "कापूसकोंडा" चित्रपटातून तब्बल २२ वर्षांनी सचिन पिळगांवकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र

मुंबई : चंदेरी दुनियेत ब्रेक मिळायला अनेक ऑडिशन्स द्याव्या लागतात. पण हा असा पहिला कलाकार आहे ज्याला ऑडिशन्स न

Ranveer and Deepika : रणवीर- दीपिका दुसऱ्यांदा होणार आई बाबा, गुड न्यूजचा फोटो पाहाच

मुंबई : दीपिकाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, धुरंधरबाबत नाही, कोणत्या नवीन सिनेमाची नाही तर, दीपिका

विनोदाच्या काट्यावरचा अत्यंत हलका भोपळा

भालचंद्र कुबल : पाचवा वेद आचार्य अत्र्यांनी आपल्या लेखन कारकिर्दीत एकूण २५ नाटके लिहिली. त्यातले भ्रमाचा भोपळा

Marathi Sahitya Sangh Mandir : साहित्य संघ मंदिर आणि नाट्यरसिक : एक अक्षय्य नाते...

राजरंग : राज चिंचणकर मुंबई नगरीत साहित्य, नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रात गेली तब्बल ९० वर्षे कार्यरत असलेली संस्था