Mahakumbh: महाशिवरात्रीला महाकुंभमध्ये आज महास्नान, लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी

प्रयागराज: आज महाशिवरात्रीला महाकुंभचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या महास्नानासाठी लोकांची मोठी गर्दी संगमावर पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारसाठी आजचा दिवस एखाद्या महत्त्वाच्या परीक्षेपेक्षा काही कमी नाही.


आज दोन कोटींहून अधिक भक्तगण महाकुंभमध्ये येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर मेळावा प्रशासनाने सर्व तयारी आधीच पूर्ण केली आहे.


गेल्या ४४ दिवसांमध्ये महाकुंभमधील ६५ कोटींहून अधिक भक्तगण महाकुंभमध्ये स्नानाचा आनंद घेऊन गेले आहेत. दरम्यान, विरोधी पक्षाकडून संगम जल पासून ते व्यवस्थेवर अनेक सवाल करण्यात आले. मात्र आतापर्यंत अनेक आव्हानांचा सामना यशस्वीपणे करण्यात आला आहे.


 


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्रिवेणी संगमामध्ये आस्थेची डुबकी घेण्यासाठी पोहोचलेल्या भक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाकुंभमध्ये २५ फेब्रुवारी रात्री ८ वाजेपर्यंत १.३४ कोटीहून अधिक लोक पोहोचले होते. याआधी २४ एप्रिलपर्यंत एकूण ६३.३६ कोटी लोकांनी स्नानाचा आनंद घेतला आहे.

Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर