प्रयागराज: आज महाशिवरात्रीला महाकुंभचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या महास्नानासाठी लोकांची मोठी गर्दी संगमावर पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारसाठी आजचा दिवस एखाद्या महत्त्वाच्या परीक्षेपेक्षा काही कमी नाही.
आज दोन कोटींहून अधिक भक्तगण महाकुंभमध्ये येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर मेळावा प्रशासनाने सर्व तयारी आधीच पूर्ण केली आहे.
गेल्या ४४ दिवसांमध्ये महाकुंभमधील ६५ कोटींहून अधिक भक्तगण महाकुंभमध्ये स्नानाचा आनंद घेऊन गेले आहेत. दरम्यान, विरोधी पक्षाकडून संगम जल पासून ते व्यवस्थेवर अनेक सवाल करण्यात आले. मात्र आतापर्यंत अनेक आव्हानांचा सामना यशस्वीपणे करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्रिवेणी संगमामध्ये आस्थेची डुबकी घेण्यासाठी पोहोचलेल्या भक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाकुंभमध्ये २५ फेब्रुवारी रात्री ८ वाजेपर्यंत १.३४ कोटीहून अधिक लोक पोहोचले होते. याआधी २४ एप्रिलपर्यंत एकूण ६३.३६ कोटी लोकांनी स्नानाचा आनंद घेतला आहे.
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…