२०२६ पासून बदलणार CBSE बोर्ड परीक्षेची सिस्टीम, वर्षातून दोन वेळा होणार १०वीची परीक्षा

मुंबई: वर्ष २०२६ पासून सीबीएसई बोर्डाच्या(CBSE) दहावीच्या परीक्षेमध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे. बोर्डाने या बदलाबाबत निर्णय घेतला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार २०२६ पासून १०वीची बोर्डाची परीक्षा वर्षात दोन वेळा आयोजित केली जाईल. या बदलाचे मुख्य कारण विद्यार्थ्यांना आपली तयारी चांगली करण्यासाठी तसेच परीक्षेत चांगली कामगिरी करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.



सध्या अशी होतेय परीक्षा


सध्या १०वी आणि १२वीच्या बोर्ड परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्चदरम्यान आयोजित केल्या जातात. कोरोना महामारीमुळे सीबीएसईने एक विशेष उपायच्या रूपात परीक्षांना दोन सत्रामध्ये विभाजित केले होते. दरम्यान, स्थिती सामान्य होताच बोर्डाने पुढच्याच वर्षापासून आपली जुनी सिस्टीम सुरू केली.



कशी असेल नवी परीक्षा सिस्टीम?


सीबीएसईनुसार १०वी परीक्षेचा पहिला टप्पा फेब्रुवारी-मार्चमध्ये असेल तर दुसरा टप्पा मेमध्ये आयोजित केला जाईल. विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांमध्ये बसण्याची संधी मिळेल. मात्र हे गरजेचे नसेल. जर एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही तर ते दुसरी परीक्षा देऊ शकतात. रिपोर्ट्सनुसार १०वी बोर्डाच्या परीक्षेचा पहिला टप्पा १७ फेब्रुवारी ते सहा मार्च २०२६ पर्यंत असेल. दुसरा टप्पा ५ मे ते २० मे २०२६ पर्यंत आयोजित असेल.



विद्यार्थ्यांना कसा होणार फायदा?


विद्यार्थ्यांना एका वर्षात दोन वेळा परीक्षा देण्याची संधी मिळेल. जर पहिल्या परीक्षेत चांगली कामगिरी झाली नसेल तर त्यांच्या मानसिक आरोग्य आणि त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला लक्षात घेतले जाईल. तसेच या बदलामुळे परीक्षेची भीती कमी होईल आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक संधी मिळेल.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील