२०२६ पासून बदलणार CBSE बोर्ड परीक्षेची सिस्टीम, वर्षातून दोन वेळा होणार १०वीची परीक्षा

मुंबई: वर्ष २०२६ पासून सीबीएसई बोर्डाच्या(CBSE) दहावीच्या परीक्षेमध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे. बोर्डाने या बदलाबाबत निर्णय घेतला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार २०२६ पासून १०वीची बोर्डाची परीक्षा वर्षात दोन वेळा आयोजित केली जाईल. या बदलाचे मुख्य कारण विद्यार्थ्यांना आपली तयारी चांगली करण्यासाठी तसेच परीक्षेत चांगली कामगिरी करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.



सध्या अशी होतेय परीक्षा


सध्या १०वी आणि १२वीच्या बोर्ड परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्चदरम्यान आयोजित केल्या जातात. कोरोना महामारीमुळे सीबीएसईने एक विशेष उपायच्या रूपात परीक्षांना दोन सत्रामध्ये विभाजित केले होते. दरम्यान, स्थिती सामान्य होताच बोर्डाने पुढच्याच वर्षापासून आपली जुनी सिस्टीम सुरू केली.



कशी असेल नवी परीक्षा सिस्टीम?


सीबीएसईनुसार १०वी परीक्षेचा पहिला टप्पा फेब्रुवारी-मार्चमध्ये असेल तर दुसरा टप्पा मेमध्ये आयोजित केला जाईल. विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांमध्ये बसण्याची संधी मिळेल. मात्र हे गरजेचे नसेल. जर एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही तर ते दुसरी परीक्षा देऊ शकतात. रिपोर्ट्सनुसार १०वी बोर्डाच्या परीक्षेचा पहिला टप्पा १७ फेब्रुवारी ते सहा मार्च २०२६ पर्यंत असेल. दुसरा टप्पा ५ मे ते २० मे २०२६ पर्यंत आयोजित असेल.



विद्यार्थ्यांना कसा होणार फायदा?


विद्यार्थ्यांना एका वर्षात दोन वेळा परीक्षा देण्याची संधी मिळेल. जर पहिल्या परीक्षेत चांगली कामगिरी झाली नसेल तर त्यांच्या मानसिक आरोग्य आणि त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला लक्षात घेतले जाईल. तसेच या बदलामुळे परीक्षेची भीती कमी होईल आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक संधी मिळेल.

Comments
Add Comment

Mantri Ashish Shelar : दशावतार लोककलेला राजाश्रय मिळणार

सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; मंडळांच्या मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्य

Ashish Shelar : रत्नागिरी-सिंधुदुर्गातील मोबाईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी सात दिवसांत अहवाल तयार करा

मंत्री आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश मुंबई : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोबाईल

Labour Minister Adv. Akash Fundkar : 'पॉश' कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करावी

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश     मुंबई : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण

Minister Adv. Ashish Shelar : मानखुर्द येथील चिल्ड्रन्स एड सोसायटीची जागा अतिक्रमणमुक्त करा

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई: मानखुर्द येथील राज्य शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि टाटा

Devendra Fadnavis : नवी मुंबईत उभी राहणार १० हजार कोटींची 'इंटरनॅशनल मेडिसिटी'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राज्य सरकार आणि अमेरिकेच्या 'क्लीव्हलँड क्लिनिक'मध्ये सामंजस्य करार मुंबई :

Mumbai birth records : मुंबईतील 19,734 जन्म दाखल्यांमधील दुरुस्त्या रद्द; मूळ नोंदी पुनर्संचयित करण्याचे सरकारचे आदेश

MUMBAI : महाराष्ट्र सरकारने 2024 ते 2026 या कालावधीत मुंबईत जन्म प्रमाणपत्रांमध्ये करण्यात आलेल्या 19,734 दुरुस्त्या रद्द