२०२६ पासून बदलणार CBSE बोर्ड परीक्षेची सिस्टीम, वर्षातून दोन वेळा होणार १०वीची परीक्षा

मुंबई: वर्ष २०२६ पासून सीबीएसई बोर्डाच्या(CBSE) दहावीच्या परीक्षेमध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे. बोर्डाने या बदलाबाबत निर्णय घेतला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार २०२६ पासून १०वीची बोर्डाची परीक्षा वर्षात दोन वेळा आयोजित केली जाईल. या बदलाचे मुख्य कारण विद्यार्थ्यांना आपली तयारी चांगली करण्यासाठी तसेच परीक्षेत चांगली कामगिरी करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.



सध्या अशी होतेय परीक्षा


सध्या १०वी आणि १२वीच्या बोर्ड परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्चदरम्यान आयोजित केल्या जातात. कोरोना महामारीमुळे सीबीएसईने एक विशेष उपायच्या रूपात परीक्षांना दोन सत्रामध्ये विभाजित केले होते. दरम्यान, स्थिती सामान्य होताच बोर्डाने पुढच्याच वर्षापासून आपली जुनी सिस्टीम सुरू केली.



कशी असेल नवी परीक्षा सिस्टीम?


सीबीएसईनुसार १०वी परीक्षेचा पहिला टप्पा फेब्रुवारी-मार्चमध्ये असेल तर दुसरा टप्पा मेमध्ये आयोजित केला जाईल. विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांमध्ये बसण्याची संधी मिळेल. मात्र हे गरजेचे नसेल. जर एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही तर ते दुसरी परीक्षा देऊ शकतात. रिपोर्ट्सनुसार १०वी बोर्डाच्या परीक्षेचा पहिला टप्पा १७ फेब्रुवारी ते सहा मार्च २०२६ पर्यंत असेल. दुसरा टप्पा ५ मे ते २० मे २०२६ पर्यंत आयोजित असेल.



विद्यार्थ्यांना कसा होणार फायदा?


विद्यार्थ्यांना एका वर्षात दोन वेळा परीक्षा देण्याची संधी मिळेल. जर पहिल्या परीक्षेत चांगली कामगिरी झाली नसेल तर त्यांच्या मानसिक आरोग्य आणि त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला लक्षात घेतले जाईल. तसेच या बदलामुळे परीक्षेची भीती कमी होईल आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक संधी मिळेल.

Comments
Add Comment

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास

Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय

Bhondubaba Ashok Kharat : भोंदू खरातविरोधात तक्रारींचा महापूर, लैंगिक शोषणाचे आणखी ११ आरोप

मुंबई : वासनांध अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, तक्रारींची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.

Bmc News, Andheri Subway : अंधेरी सब वे मधील पावसाचे तुंबणारे पाणी,  महापौरांनी  रेल्वेशी समन्वय राखून गती देण्याचे महापालिकेला दिले निर्देश

मुंबई : अंधेरी भूयारी मार्ग हा अतिसखल परिसर असल्याने पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीला अडथळा होतो. त्यावर

Bmc News : मुंबईत यापूर्वी खरेदी केलेल्या कचरा पेट्या गेल्या कुठे? महापालिका प्रशासनावर स्थायी समितीची प्रश्नांची सरबती

खासगी कंत्राटदार कचरा पेट्या देणार तर अधिक पेट्यांची खरेदी कशाला? पेट्या खरेदीचा प्रस्ताव अध्यक्षांनी ठेवला