महापालिका निवडणुका कधी होणार? आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

मुंबई (खास प्रतिनिधी): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे राज्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिले असून, न्यायालय या संदर्भात शासनाला काय निर्देश देते आणि पुढील सुनावणीची तारीख काय देते याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे. त्यामुळे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात की, मे महिन्यांत की ऑक्टोबरमध्ये जाणार हे या सुनावणीतून स्पष्ट होईल.


मुंबई महापालिकेसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील पाच ते सहा वर्षांपासून झालेल्या नाहीत. या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत. अनेक महिन्यांपासून न्यायालयात पाचिका सुनावणीसाठी आली नव्हती.


२८ जानेवारी २०२५ रोजी याची सुनावणी होऊन लवकरच याबाबतचा निर्णय दिला जाईल आणि निवडणुकीचा मार्ग खुला होईल, असे बोलले जात होते; परंतु न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख २५ फेब्रुवारीपर्यंत पुढे उकलल्याने महापालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यातच होतील अशाप्रकारचे तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे; परंतु काही विधी तन्ज आणि निवडणूक विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सर्वोच्च न्यायालय नक्की पुढील तारीख देते की काही स्पष्ट निर्देश देते याकडे सर्वांचे लक्ष असेल.


मुंबई महापालिकेचे २२७ प्रभागांच्या तुलनेत २३६ प्रभाग आघाडी सरकारच्या काळात करण्यात आले असून जुलै २०२२ मध्ये सेना भाजपा सरकार आल्यानंतर त्यांनी हा निर्णय रद्द केला. याला विरोधकांनी आक्षेप नोंदवत मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती, या याचिकेवर न्यायालयाने शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार २२७ प्रभाग राखण्याबाबत निर्णय दिल्याने मा निर्णयाविरोधात विरोधी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. त्यामुळे २२७ की २३६ प्रभाग, ओबीसी या अशा विविध याचिकेंची एकत्रित सुनावणी होणार आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Rain Update : सावधान! उद्या मुसळधार पावसाचा इशारा; मुंबई, ठाणे-रायगडला ऑरेंज अलर्ट अलर्ट

- ६० किमी वेगाने वाहणार वारे मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा पावसाने जोरदार पुनरागमन केले

BMC : मुंबईकरांना पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे BMC चे आवाहन

पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी, नागरिकांनी पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे बृहन्‍मुंबई

Central Railway's Ashadhi Special Train : आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेची भाविकांना भेट! दादर-पंढरपूरदरम्यान धावणार 2 विशेष गाड्या; आरक्षणाला सुरुवात

मुंबई : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य

Maharashtra Government : राज्य सरकारकडून ग्रामपंचायतींना अर्थबळ!

जन सुविधा निधीत मोठी वाढ; दिवाबत्तीसह सौरऊर्जा आणि क्रीडांगण विकासासाठी मिळणार विशेष अनुदान मुंबई(Mumbai) :

Hospital Facilities : रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल थांबणार

राज्यातील ६ मोठ्या शासकीय रुग्णालयांमध्ये ‘धर्मशाळा’ उभारणार मुंबई(Mumbai) : दुर्गम तसेच ग्रामीण भागातून मुंबई,

Devendra Fadnavis : मराठी भाषा आणि बोलींच्या संवर्धनाला मिळणार गती

कृती आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; गडचिरोलीत नाट्य संकुल उभारणार मुंबई : मराठी भाषा, साहित्य