कल्याण-डोंबिवलीकरांनो येथे लक्ष द्या! शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार १२ तास बंद

कल्याण (प्रतिनिधी) : उदंचन केंद्र देखभाल, दुरुस्ती आणि व्हॉल्व्ह बदलण्याची, जलवाहिन्या दुरुस्ती आणि देखभालीची कामे करण्यासाठी कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणीपुरवता येत्या गुरुवारी (ता. २७) सकाळी १० ते रात्री १० या वेळेत कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व, पश्चिम भागाचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.


कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी उल्हास नदी काठावरील मोहिली येथील उदंचन केंद्राच्या देखभाल आणि दुरुस्तीचे अत्यावश्यक काम केले जाणार आहे. तसेच कल्याण-डोंबिवली विभागातील अनेक मुख्य जलवाहिन्यांवरील व्हॉल्व्ह खराब झाले आहेत. या व्हॉल्व्हमधून पाणी गळती होते. जलवाहिन्यांची दुरुस्ती, देखभाली व अन्य कामांची होणार दुरुस्ती बारावे, मोहिली, नेतिवली येथील जलशुद्धीकरण केंद्रेही बंद कल्याण विभागाचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे, डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांच्या नियंत्रणाखाली ही देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.


या पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत बारावे, मोहिली, नेतिवली येथील जलशुद्धीकरण केंद्रेही बंद राहणार आहेत. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. हे पाणी रस्त्यावर येत असल्याने पादचारी, वाहन चालकांना त्याचा त्रास होतो. याविषयी पालिकेत या पाणी गळती विषयक अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या बंदच्या काळात ही व्हॉल्व्ह दुरुस्तीची कामेही प्राधान्याने केली जाणार आहेत. कल्याण-डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांमध्ये काही तांत्रिक बिघाड आहेत. काही ठिकाणी जलवाहिन्यांमध्ये हवेचे (एअर) प्रमाण अधिक आहे. त्यामुळे काही भागाला पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. डोंबिवली पश्चिमेत गणेशनगर भागात हा प्रश्न अनेक महिन्यांपासून सुरू आहे.


काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्या भागातील भूमिगत जलवाहिन्यांची तपासणी या बंदच्या पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन या कालावधीत शहराच्या प्रत्येक भागात पुरेशा दाबावाने पाणीपुरवठा झाला पाहिजे यादृष्टीनेही ही जलवाहिन्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत, असे कार्यकारी अभियंता घोडे यांनी सांगितले. शुक्रवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पाणीपुरवठा अधिकाऱ्यानी केले आहे. काळात केली जाणार आहे, असे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Marathi :मराठीचे धिंडवडे काढणारा 'तो' फलक अखेर हटवला

 'प्रहार'च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मराठी भाषेची आणि व्याकरणाची

Minister Nitesh Rane : मत्स्यव्यवसाय विभागाने आर्थिक काटकसर करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : मत्स्यव्यवसाय विभागाच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि आर्थिक शिस्त यांना सर्वोच्च प्राधान्य

Police misguidance : दारूचा नाद लई बेक्कार ! थेट पोलिसांना कॉल केला अन...

अकोला : दारूच्या नशेत वाघापूर येथील एका तरुणाने चक्क पोलिसांना फोन केला आणि खोटी माहिती दिल्याचा प्रकार समोर आला

Nitesh Rane : ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून मोती तलावाचे पुनरुज्जीवन करणार - पालकमंत्री नितेश राणे

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे वैभव असलेल्या प्रसिद्ध मोती तलावाचे मूळ ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा

Mahayuti : विधान परिषदेच्या पुण्याच्या जागेसाठी महायुतीतच चुरस

जिल्ह्यात महायुतीचे ७३४ सदस्य आहेत. मात्र, आपल्या या पारंपरिक हक्काच्या जागेवर दावा सांगणारा अजित पवार गट आणि

Pune Porsche Car Accident Case : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात नवा वाद! जामिनावर सुटल्यानंतर अग्रवाल कुटुंबाची जंगी पार्टी, VIDEO व्हायरल

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणाने देशभरात खळबळ उडवून दिली होती.