कल्याण-डोंबिवलीकरांनो येथे लक्ष द्या! शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार १२ तास बंद

कल्याण (प्रतिनिधी) : उदंचन केंद्र देखभाल, दुरुस्ती आणि व्हॉल्व्ह बदलण्याची, जलवाहिन्या दुरुस्ती आणि देखभालीची कामे करण्यासाठी कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणीपुरवता येत्या गुरुवारी (ता. २७) सकाळी १० ते रात्री १० या वेळेत कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व, पश्चिम भागाचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.


कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी उल्हास नदी काठावरील मोहिली येथील उदंचन केंद्राच्या देखभाल आणि दुरुस्तीचे अत्यावश्यक काम केले जाणार आहे. तसेच कल्याण-डोंबिवली विभागातील अनेक मुख्य जलवाहिन्यांवरील व्हॉल्व्ह खराब झाले आहेत. या व्हॉल्व्हमधून पाणी गळती होते. जलवाहिन्यांची दुरुस्ती, देखभाली व अन्य कामांची होणार दुरुस्ती बारावे, मोहिली, नेतिवली येथील जलशुद्धीकरण केंद्रेही बंद कल्याण विभागाचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे, डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांच्या नियंत्रणाखाली ही देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.


या पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत बारावे, मोहिली, नेतिवली येथील जलशुद्धीकरण केंद्रेही बंद राहणार आहेत. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. हे पाणी रस्त्यावर येत असल्याने पादचारी, वाहन चालकांना त्याचा त्रास होतो. याविषयी पालिकेत या पाणी गळती विषयक अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या बंदच्या काळात ही व्हॉल्व्ह दुरुस्तीची कामेही प्राधान्याने केली जाणार आहेत. कल्याण-डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांमध्ये काही तांत्रिक बिघाड आहेत. काही ठिकाणी जलवाहिन्यांमध्ये हवेचे (एअर) प्रमाण अधिक आहे. त्यामुळे काही भागाला पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. डोंबिवली पश्चिमेत गणेशनगर भागात हा प्रश्न अनेक महिन्यांपासून सुरू आहे.


काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्या भागातील भूमिगत जलवाहिन्यांची तपासणी या बंदच्या पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन या कालावधीत शहराच्या प्रत्येक भागात पुरेशा दाबावाने पाणीपुरवठा झाला पाहिजे यादृष्टीनेही ही जलवाहिन्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत, असे कार्यकारी अभियंता घोडे यांनी सांगितले. शुक्रवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पाणीपुरवठा अधिकाऱ्यानी केले आहे. काळात केली जाणार आहे, असे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Vande Bharat : पुणे-बंगळूरू प्रवास होणार सुपरफास्ट! अत्याधुनिक सुविधांसह वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच धावणार

पुणे : भारतीय रेल्वे महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी, विशेषतः पुणेकरांसाठी एक मोठी

LPG Scam : पोलिसांनी उधळला LPG सिलिंडरचा काळा बाजार करण्याचा डाव

ठाणे : पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यापासून देशात ठिकठिकाणी एलपीजी सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण करून

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीवर मोठा प्रहार; २६ लाखांचा गांजा जप्त, एकाला अटक

पुणे : छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात धडक

Nagpur News : नागपुरात IPL सट्टेबाजीचा मोठा पर्दाफाश; ४० लाखांची रोकड जप्त, 'दुबई कनेक्शन'ने पोलीस चक्रावले!

नागपूर : आयपीएलच्या (IPL) रणधुमाळीत नागपूर शहरात सट्टेबाजीचे जाळे वेगाने पसरल्याचे समोर आले आहे. प्रतापनगर

Dhule News : रक्तदाब घटला, झटके आले अन्... धुळ्यातील अविवाहित तरुणीचं गर्भपात प्रकरण उघड

धुळे : धुळे शहरालगतच्या एका गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्नाआधीच गरोदर राहिलेल्या एका १८ वर्षीय

Nashik Crime IT Company : हाऊसकिपींगच्या वेशात नाशिकच्या महिला पोलिसांनी केला आयटी कंपनीचा पर्दाफाश; उलघडले अनेक खुलासे

नाशिक : महिलांवर अत्याचार करणाऱ्या महिलांना फसवणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात हे प्रकरण सुरु असतानाच नाशिकच्या