कल्याण-डोंबिवलीकरांनो येथे लक्ष द्या! शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार १२ तास बंद

  82

कल्याण (प्रतिनिधी) : उदंचन केंद्र देखभाल, दुरुस्ती आणि व्हॉल्व्ह बदलण्याची, जलवाहिन्या दुरुस्ती आणि देखभालीची कामे करण्यासाठी कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणीपुरवता येत्या गुरुवारी (ता. २७) सकाळी १० ते रात्री १० या वेळेत कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व, पश्चिम भागाचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.


कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी उल्हास नदी काठावरील मोहिली येथील उदंचन केंद्राच्या देखभाल आणि दुरुस्तीचे अत्यावश्यक काम केले जाणार आहे. तसेच कल्याण-डोंबिवली विभागातील अनेक मुख्य जलवाहिन्यांवरील व्हॉल्व्ह खराब झाले आहेत. या व्हॉल्व्हमधून पाणी गळती होते. जलवाहिन्यांची दुरुस्ती, देखभाली व अन्य कामांची होणार दुरुस्ती बारावे, मोहिली, नेतिवली येथील जलशुद्धीकरण केंद्रेही बंद कल्याण विभागाचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे, डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांच्या नियंत्रणाखाली ही देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.


या पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत बारावे, मोहिली, नेतिवली येथील जलशुद्धीकरण केंद्रेही बंद राहणार आहेत. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. हे पाणी रस्त्यावर येत असल्याने पादचारी, वाहन चालकांना त्याचा त्रास होतो. याविषयी पालिकेत या पाणी गळती विषयक अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या बंदच्या काळात ही व्हॉल्व्ह दुरुस्तीची कामेही प्राधान्याने केली जाणार आहेत. कल्याण-डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांमध्ये काही तांत्रिक बिघाड आहेत. काही ठिकाणी जलवाहिन्यांमध्ये हवेचे (एअर) प्रमाण अधिक आहे. त्यामुळे काही भागाला पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. डोंबिवली पश्चिमेत गणेशनगर भागात हा प्रश्न अनेक महिन्यांपासून सुरू आहे.


काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्या भागातील भूमिगत जलवाहिन्यांची तपासणी या बंदच्या पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन या कालावधीत शहराच्या प्रत्येक भागात पुरेशा दाबावाने पाणीपुरवठा झाला पाहिजे यादृष्टीनेही ही जलवाहिन्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत, असे कार्यकारी अभियंता घोडे यांनी सांगितले. शुक्रवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पाणीपुरवठा अधिकाऱ्यानी केले आहे. काळात केली जाणार आहे, असे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

सरकार क्रीडा क्षेत्राला चालना देत आहे : चंद्रशेखर बावनकुळे

शेवगाव : आपले सरकार क्रीडा धोरण पुढे घेऊन जात गावा-गावात खेलो इंडियाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला चालना

राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आली, तर खरी क्रांती : शिवगिरी महाराज

संगमनेर : धर्माच्या कार्यासाठी आणि प्रचार व प्रसार करण्यासाठी राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आली तर खरी क्रांती

​Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर​ चार महिन्यांत ११ बळी!

मुंबई- पुणे या सहा पदरी महामार्गावरील आजघडीला दररोज लाखो वाहने धावतात. यशवंतराव चव्हाण द्रूतगती मार्ग म्हणून

Pune News : बकरी ईद निमित्त पुण्यातील ‘हे’ रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते वाचा

पुणे : मुस्लिम बांधवांसाठी बकरी ईद हा एक महत्वाचा सण आहे. देशभरात ७ जून रोजी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली

Rajgad Fort : पतीसह गेली राजगड फिरायला; पाय घसरला अन् थेट १५० फूट दरीत कोसळली

पुणे : पुण्यातील राजगडावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. पावसाळा सुरु होताच अनेकांनी गाद किल्ले फिरायला सुरुवात केली

राज ठाकरे लागले कामाला, पक्षात मोठे फेरबदल, ९ जूनला ठाकरेंचा दौरा

पुणे :  पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुण्यात