कल्याण-डोंबिवलीकरांनो येथे लक्ष द्या! शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार १२ तास बंद

कल्याण (प्रतिनिधी) : उदंचन केंद्र देखभाल, दुरुस्ती आणि व्हॉल्व्ह बदलण्याची, जलवाहिन्या दुरुस्ती आणि देखभालीची कामे करण्यासाठी कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणीपुरवता येत्या गुरुवारी (ता. २७) सकाळी १० ते रात्री १० या वेळेत कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व, पश्चिम भागाचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.


कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी उल्हास नदी काठावरील मोहिली येथील उदंचन केंद्राच्या देखभाल आणि दुरुस्तीचे अत्यावश्यक काम केले जाणार आहे. तसेच कल्याण-डोंबिवली विभागातील अनेक मुख्य जलवाहिन्यांवरील व्हॉल्व्ह खराब झाले आहेत. या व्हॉल्व्हमधून पाणी गळती होते. जलवाहिन्यांची दुरुस्ती, देखभाली व अन्य कामांची होणार दुरुस्ती बारावे, मोहिली, नेतिवली येथील जलशुद्धीकरण केंद्रेही बंद कल्याण विभागाचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे, डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांच्या नियंत्रणाखाली ही देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.


या पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत बारावे, मोहिली, नेतिवली येथील जलशुद्धीकरण केंद्रेही बंद राहणार आहेत. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. हे पाणी रस्त्यावर येत असल्याने पादचारी, वाहन चालकांना त्याचा त्रास होतो. याविषयी पालिकेत या पाणी गळती विषयक अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या बंदच्या काळात ही व्हॉल्व्ह दुरुस्तीची कामेही प्राधान्याने केली जाणार आहेत. कल्याण-डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांमध्ये काही तांत्रिक बिघाड आहेत. काही ठिकाणी जलवाहिन्यांमध्ये हवेचे (एअर) प्रमाण अधिक आहे. त्यामुळे काही भागाला पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. डोंबिवली पश्चिमेत गणेशनगर भागात हा प्रश्न अनेक महिन्यांपासून सुरू आहे.


काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्या भागातील भूमिगत जलवाहिन्यांची तपासणी या बंदच्या पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन या कालावधीत शहराच्या प्रत्येक भागात पुरेशा दाबावाने पाणीपुरवठा झाला पाहिजे यादृष्टीनेही ही जलवाहिन्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत, असे कार्यकारी अभियंता घोडे यांनी सांगितले. शुक्रवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पाणीपुरवठा अधिकाऱ्यानी केले आहे. काळात केली जाणार आहे, असे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे