GBS : जीबीएसची वाढती दहशत! मुंबईत ३ नवे रुग्ण दाखल

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस जीबीएसचे संकट वाढत चालले आहे. सातत्याने जीबीएसची (GBS) लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशातच आता मुंबईत (Mumbai) जीबीएसचे तीन नवे रुग्ण दाखल झाले आहेत. या रुग्णांवर सध्या मुंबईतील जे.जे. रुग्णालयात (JJ Hospital) उपचार सुरु आहेत. त्यामुळे राज्यातील जीबीएसच्या रुग्णांचा एकूण आकडा २१४ वर गेला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन-तीन दिवसांत धुळे, ठाणे आणि वाडा येथून आलेले जीबीएस बाधित रुग्णांवर मुंबईत उपचार सुरु आहेत. यापैकी एा रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर इतर दोन रुग्णांना सर्वसाधारण वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, जीबीएसचे मुख्यत: प्रौढ रुग्ण रुग्णालयात येत आहेत, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सुरवसे यांनी दिली.



काय आहेत लक्षणे?


दूषित अन्न किंवा पाणी घेतल्यामुळे कॅम्पिलोबॅक्टर विषाणू संसर्ग होतो. यामुळे जुलाब आणि पोटदुखी होऊ शकते. काही जणांमध्ये या संसर्गामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. डेंग्यू, चिकुनगुनिया आणि इतर संसग्दिखील याला कारणीभूत ठरू शकतात. जुलाब (रक्तासह होऊ शकतो), पोटदुखी, ताप, मळमळ किंवा उलट्या अशी याची लक्षणे आहेत.



काय आहेत उपाय?


नेहमी पाणी उकळून प्या. सकस व ताजे अन्न घ्या. भाज्या व फळे स्वछ धुऊन घ्या. चिकन, मासे चांगले शिजवून घ्या (७५ अंश सेल्सिअस तापमानाला), अर्थवट शिजलेले अन्न व कच्चे अंडे खाणे टाळा. जेवणापूर्वी आणि टॉयलेटनंतर हात साबणाने स्वछ धुवा. दुसत्यांसोबत भांडी वा अन्न वाटून खाणे टाळा. किचन स्वच्छ ठेवा. कच्चे व शिजलेले अन्न वेगवेगळे ठेवा, स्वयंपाकघर व भांडी स्वच्छ ठेवा. हा आजार सामान्यत दुर्मीळ आहे; पण अलीकडील काही दिवसांत पुण्यातील सिंहगड रोड भागात याची प्रकरणे वाढली आहेत. अशा स्थितीत सुरुवातीला जाणवणारी लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे. अतिसार किंवा खोकला येणे, पाय किंवा हातात अचानक अशक्तपणा जाणवणे, चालता न येणे किंवा शरीर बधिर होणे, रक्तासह अतिसार होणे अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Comments
Add Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सोयी-सुविधांची कमतरता नको!

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा

डिसेंबर २०२८ नंतर सिग्नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय होणार प्रवास, महापालिकेच्या या प्रकल्पाची वाढतेय गती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्‍यान नवीन जोडमार्ग स्‍थापित होत आहे. पश्चिमेकडील

मुंबईत चार नवीन कबूतर खाने, पण बाकीचे बंद म्हणजे बंदच....

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील विद्यमान कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान,

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

मुंबई : पवईतील स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.