GBS : जीबीएसची वाढती दहशत! मुंबईत ३ नवे रुग्ण दाखल

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस जीबीएसचे संकट वाढत चालले आहे. सातत्याने जीबीएसची (GBS) लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशातच आता मुंबईत (Mumbai) जीबीएसचे तीन नवे रुग्ण दाखल झाले आहेत. या रुग्णांवर सध्या मुंबईतील जे.जे. रुग्णालयात (JJ Hospital) उपचार सुरु आहेत. त्यामुळे राज्यातील जीबीएसच्या रुग्णांचा एकूण आकडा २१४ वर गेला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन-तीन दिवसांत धुळे, ठाणे आणि वाडा येथून आलेले जीबीएस बाधित रुग्णांवर मुंबईत उपचार सुरु आहेत. यापैकी एा रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर इतर दोन रुग्णांना सर्वसाधारण वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, जीबीएसचे मुख्यत: प्रौढ रुग्ण रुग्णालयात येत आहेत, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सुरवसे यांनी दिली.



काय आहेत लक्षणे?


दूषित अन्न किंवा पाणी घेतल्यामुळे कॅम्पिलोबॅक्टर विषाणू संसर्ग होतो. यामुळे जुलाब आणि पोटदुखी होऊ शकते. काही जणांमध्ये या संसर्गामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. डेंग्यू, चिकुनगुनिया आणि इतर संसग्दिखील याला कारणीभूत ठरू शकतात. जुलाब (रक्तासह होऊ शकतो), पोटदुखी, ताप, मळमळ किंवा उलट्या अशी याची लक्षणे आहेत.



काय आहेत उपाय?


नेहमी पाणी उकळून प्या. सकस व ताजे अन्न घ्या. भाज्या व फळे स्वछ धुऊन घ्या. चिकन, मासे चांगले शिजवून घ्या (७५ अंश सेल्सिअस तापमानाला), अर्थवट शिजलेले अन्न व कच्चे अंडे खाणे टाळा. जेवणापूर्वी आणि टॉयलेटनंतर हात साबणाने स्वछ धुवा. दुसत्यांसोबत भांडी वा अन्न वाटून खाणे टाळा. किचन स्वच्छ ठेवा. कच्चे व शिजलेले अन्न वेगवेगळे ठेवा, स्वयंपाकघर व भांडी स्वच्छ ठेवा. हा आजार सामान्यत दुर्मीळ आहे; पण अलीकडील काही दिवसांत पुण्यातील सिंहगड रोड भागात याची प्रकरणे वाढली आहेत. अशा स्थितीत सुरुवातीला जाणवणारी लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे. अतिसार किंवा खोकला येणे, पाय किंवा हातात अचानक अशक्तपणा जाणवणे, चालता न येणे किंवा शरीर बधिर होणे, रक्तासह अतिसार होणे अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

मासिक पाळी दरम्यान रजा योग्य की अयोग्य?

राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान

कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीबाबत न्यायालयात सक्षम बाजू मांडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व