Earthquake: बंगालच्या खाडीमध्ये ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, कोलकातासह अनेक शहरांमध्ये बसले धक्के

मुंबई: पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवले. बंगालच्या खाडीमध्ये आलेल्या या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सीमोलॉजीच्या माहितीनुसार हा भूकंप सकाळी ६.१० वाजता आला होता.


सकाळी सकाळीच भूकंपाचे धक्के बसल्याने कोलकातामध्ये राहणारे लोक भयभीत झाले आणि घराबाहेर पडले. दरम्यान, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जिवीत अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाचे धक्के कोलकाताशिवाय पश्चिम बंगालमधील दुसऱ्या शहरांनाही जाणवले.


नॅशनल सीस्मॉलॉजी सेंटरच्या माहितीनुसार २५ फेब्रुवारीला सकाळी ६.१० वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्र बिंदू बंगालची खाडी ९१ किमी खोल होता.


 


हिमाचलच्या मंडीमध्ये रविवारी आला होता भूकंप


हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात रविवारी सकाळी ८.४२ वाजता मध्यम तीव्रतेचा भूकंप आला होता. मंडीच्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. दरम्यान,यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवित अथवा वित्तहानी झाली नाही.

Comments
Add Comment

संसदेत ई-सिगारेट वादाने खळबळ; अनुराग ठाकूर यांच्या आरोपांवर टीएमसीची जोरदार प्रतिक्रिया

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत ई सिगारेट या एका मुद्द्यावरून गदारोळ निर्माण

ऐतिहासिक सन्मान! युनेस्कोच्या वारसा यादीत 'दिवाळी'चा समावेश

नवी दिल्ली : भारताची गौरवशाली आणि निरंतर चालत आलेली परंपरा असलेल्या दीपावली सणाला अखेर जागतिक स्तरावर ऐतिहासिक

नेहरू-गांधी कुटुंबांकडून तीन वेळा मतचोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप फक्त दोन मते िमळूनही नेहरू झाले पंतप्रधान ! नवी दिल्ली : नेहरू-गांधी

गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून