पुण्यात बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद

पुणे : संवाद साधण्यासाठी सोमवार २४ फेब्रुवारी रोजी पुणे येथे बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती राज्याचे पणन मंत्री आणि कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी दिली. परिषदेत राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक आणि सचिव सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे हे परिषदेचे आयोजक आहेत. परिषद पुण्याच्या बाणेरमधील बंटारा भवन येथे होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार परिषदेचे उद्घाटन करतील. पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्यासह कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे आदी या परिषदेस उपस्थित असतील.

राज्यातील ३०५ बाजार समित्या व त्यांच्या ६२३ उप बाजारांच्या माध्यमातून राज्यात उत्पादित शेतमालाची सुरळीत विक्री व्यवस्था विकसित करण्याचे कामकाज गेल्या ४० वर्षापासून सुरू आहे. राज्यातील बाजार समित्यांच्या कामकाजात कालानुरूप बदल घडविणे, शेतमालाच्या विपणनामध्ये आधुनिक बाबींचा अंगीकार करणे, शेतकरी व इतर सर्व बाजार घटकांना द्यावयाच्या सोई-सुविधा, त्यात येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाय योजना आदी विषयांसंदर्भात परिषदेमध्ये चर्चा केली जाणार आहे.

राज्यात कृषी पणन व्यवस्थेत अद्ययावतपणाबरोबरच सुसूत्रता आणि समन्वयता आणण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय नियोजनाचे कामकाजही करण्यात येत आहे. कृषी पणन मंडळाने कृषी पणन व्यवस्थेत आधुनिकीकरण, सुधारणा आणण्याबरोबरच राज्यात कृषी पणन व्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध प्रकल्प राबविणे, योजना राबविणे, नवीन कार्यक्रम आखणे याचबरोबर शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या संस्थांच्या विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील बाजार समित्यांचे पदाधिकारी, अधिकारी/ कर्मचारी यांच्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. तसेच राज्यात कृषी मालासाठी निर्यात सुविधा केंद्रांची उभारणी करुन त्यांच्यामार्फत निर्यातवृद्धी करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून परिषदेचे आयोजन करण्यात येत असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले.

परिषदेमध्ये राज्यातील बाजार समित्यांचे आधुनिकीकरण, बाजार समितीनिहाय विकास आराखडा, बाजार समित्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अ़डीअडचणी व उत्पन्न वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना आदींबाबत चर्चा अपेक्षित असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली.
Comments
Add Comment

Palghar School Holiday : पालघरमध्ये मुसळधार पावसाचा कहर; आज सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी, डहाणू-तलासरीत पूरस्थिती

पालघर : पालघर जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD)

Weather Update : मुंबई, ठाणे, रायगडसह 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; पुढील 3 तास मुसळधार पावसाचा इशारा

Weather Update :  गेल्या दोन दिवसांपासून मुंबई (Mumbai), उपनगरे, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी

Pune Rain : पुण्यात पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम; घाटमाथ्यावर रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे : जुलैच्या सुरुवातीला दमदार हजेरी लावल्यानंतर काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतले संतांच्या पादुकांचे दर्शन

पंढरपूर : “राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, सर्वांना सुखी ठेव,” असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज

Ashadhi Ekadashi 2026 : पांडुरंगाच्या कानात माशाच्या आकाराची कुंडले का असतात ? जाणून घ्या 'हे' गुपित अन् पौराणिक कथा!

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, वारकरी संप्रदायाचे प्राण आणि भक्तांचे पाठीराखे असलेल्या भगवान

Shivshahi Bus Fire : धावत्या शिवशाही बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले ५० हून अधिक प्रवाशांचे प्राण

धुळे : धुळे शहराजवळील नगाव बारी परिसरात नंदुरबारहून धुळ्याकडे येणाऱ्या शिवशाही बसला बुधवारी अचानक भीषण आग