छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना नामांकन

पॅरिस : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा यासाठी सांस्कृतिक विभाग मंत्री आशिष शेलार यांनी शिष्टमंडळासह युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांची भेट घेतली. 'महाराष्ट्र आणि मुंबईचे सुपुत्र असलेल्या विशाल यांच्यासह, केंद्र सरकारच्या प्रयत्नाने आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने आपल्या शिवछत्रपतींच्या १२ गड किल्ल्यांचे जागतिक वारसामध्ये नामांकन झाले आहे,' अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.





अंतिम निर्णय व्हायचा आहे. त्याबद्दलचे सादरीकरण व यासंबंधित पुढील टप्प्यातील तयारीसाठी शिष्टमंडळासह येऊन चर्चा केल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. यावेळी शिष्टमंडळ सदस्य म्हणून अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उप संचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शिखा जैन उपस्थित होत्या.



छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला, स्वराज्याची पहिली राजधानी असलेला राजगड, स्वराज्याच्या विस्तारानंतर राजधानी केलेला रायगड, यांच्यासह एकूण १२ किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. 'मराठा लष्करी भूप्रदेश' (Maratha Military Landscape of India) या संकल्पनेच्याआधारे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनुसार शिष्टमंडळाने हा प्रस्ताव सादर केला.

एकूण १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर

रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला
Comments
Add Comment

अमेरिकेच्या गाझा शांतता योजनेशी हमास सहमत

वॉशिंग्टन : पॅलेस्टिनी मिलिशिया गट हमासने अमेरिकेच्या गाझा शांतता प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. शांतता

सरकारी निधी थांबल्यामुळे नासातही शटडाऊन

वॉशिंग्टन : अमेरिकेते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर उच्च टॅरिफ लावले असताना, त्यांच्या

Munich Airport : हादरा! म्युनिक विमानतळावर अचानक '१७ रशियन ड्रोन'; तातडीने विमानसेवा बंद

म्युनिक : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध आता केवळ दोन देशांपर्यंत मर्यादित राहिलं नसून, त्यात जगातील अनेक

रशियाच्या दोन मोठ्या निर्णयांमुळे भारताचा फायदा

मॉस्को : भारत रशियातून करत असलेल्या आयातीत वाढ झाली आहे. वाजवी दरामुळे भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेलाची

पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे बेताल वक्तव्य, Pok खेळाडूबाबत म्हणाली असं काही...आता दिले हे स्पष्टीकरण

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि सध्या समालोचक (Commentator) म्हणून काम पाहणाऱ्या सना

पाकव्याप्त काश्मीर पेटला! लष्कराची सुद्धा केली नाकांबदी; पीओकेत पाक सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार ; १० जणांचा मृत्यू तर १०० जखमी

जीवनावश्यक वस्तूंवरील सबसिडी रद्द केल्याने जनक्षोभ उसळला! आंदोलकांकडून सैनिकांचा 'मानवी ढाल' म्हणून