Kasara Ghat : मुंबई-नाशिक मार्गावरील जुना कसारा घाट आठ दिवस बंद

शहापूर  : मुंबई - नाशिक महामार्गावरील नाशिककडे जाणाऱ्या जुन्या कसारा घाटातील रस्त्याची दुरुस्ती दोन टप्प्यांत होणार असल्याने आठ दिवस हलक्या व अवजड वाहनांसाठी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नवीन कसारा घाटातून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.



मुंबई - नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात किमी ४६६/८०० ते ४७४/३०० दरम्यान रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. याकरिता २४ ते २७ फेब्रुवारी व ३ ते ६ मार्च दरम्यान सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हलक्या व जड वाहनांसाठी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये व चालकांना इप्सित स्थळी जाण्यासाठी अडचण होऊ नये म्हणून चालकांनी पर्यायी मार्गाने वाहतूक करण्याचे आवाहन पोलीस महासंचालक डॉ. सुरेशकुमार मेकला यांनी केले आहे. नाशिक दिशेला जाणारी वाहने ४७४/३०० चिंतामणवाडी पोलीस चौकी समोरून वाहतूक उजव्या बाजूने नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत जुना कसारा घाट वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येणार आहे.


तसेच नाशिक ते मुंबई वाहतूक करणारी वाहने नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० वरून यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच मुंबई-नाशिक वाहतूक करणारे वाहनांनी यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग क्र. ६० वरून इच्छित स्थळी जातील.

Comments
Add Comment

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,