माजी मुख्यमंत्री आतिशी दिल्ली विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री आतिशी यांची निवड करण्यात आली आहे. आज, रविवारी आम आदमी पार्टीच्या पक्ष मुख्यालयात झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीत सर्व आमदारांनी आतिशी यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड केली. त्यांच्या माध्यमातून दिल्ली विधानसभेला पहिल्या विरोधी पक्षनेत्या मिळाल्या आहेत.


आतिशी आता दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावतील. त्या कालका मतदारसंघाच्या आमदार आहेत. आप सरकारमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांच्या कामामुळे पक्षातही त्यांचा लौकिक वाढला आहे.


विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सौरभ भारद्वाज यांसारख्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला, मात्र आतिशी कालकाची आपली जागा वाचवण्यात यशस्वी झाल्या. पक्षातील एक मजबूत महिला चेहरा असल्याने, बैठकीत आतिशी यांचे नाव प्रस्तावित करण्यात आले होते.

Comments
Add Comment

Bharat Electronics Limited : संरक्षण मंत्रालयाचा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत 1476 कोटींचा करार

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करासाठी किमान पाच ग्राउंड-बेस्ड मोबाईल इलेक्ट्रॉनिक सिस्टीमच्या

Narendra Modi : युएईच्या तेलक्षेत्रावरील इराणच्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून तीव्र शब्दांत निषेध

नवी दिल्ली : इराणकडून संयुक्त अरब अमिराती (यूएई)च्या फुजैराह तेल औद्योगिक क्षेत्रावर झालेल्या हल्ल्यात तीन

'आयुष्मान भारत' ८ वर्षानंतर राष्ट्रीय होणार, लवकरच 'या' राज्यांमध्ये 'आयुष्मान भारत' लागू होणार

पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक विजयानंतर, भारतीय जनता पक्ष केवळ राज्यात नेतृत्व निवडीच्या प्रक्रियेतच गुंतलेला

मोठी बातमी ! कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस

West Bengal : कोलकाता पोलीस दलाचे उपायुक्त (DCP) शांतनु सिन्हा बिस्वास सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील अंमलबजावणी

PM Narendra Modi : युएईच्या तेलक्षेत्रावरील इराणच्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून तीव्र शब्दांत निषेध

इराणकडून संयुक्त अरब अमिराती (यूएई)च्या फुजैराह तेल औद्योगिक क्षेत्रावर झालेल्या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक

Viral : मोठ्या भावाची ती मिठी; आणि वाचले धाकट्याचे प्राण

केरळम : कधी सक्खे भाऊ पक्के वैरी असतात तर कधी एकमेकांचा जीव वाचवायला कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, कोणताही धोका