Minister Nitesh Rane : सावंतवाडीतील कार्यकर्त्यांनी केलेले काम राज्याला प्रेरणादायी : पालकमंत्री नितेश राणे

सावंतवाडी : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघ सातत्याने चर्चेत होता. ज्यांना पक्षाने ताकद दिली, मोठं केलं ते ऐन निवडणुकीत पक्षाच्या विरोधात गेले. पक्ष संघटना संपवण्याचे काम स्वकीयांनी केले. कार्यकर्त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला गेला.आमच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका केली. मात्र, असे असताना आमच्या कार्यकर्त्यांनी नि:स्वार्थी पद्धतीने केलेलं काम कौतुकास्पद आहे. पक्ष संकटात असताना स्वतःचा विचार न करता पक्षाचा झेंडा हाती घेऊन इथले कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले.


या दोन्ही निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मिळविलेल्या यशामुळे या मतदारसंघाचे नाव महाराष्ट्रात चर्चिलं गेलं. त्यामुळे महाराष्ट्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सावंतवाडीतील कार्यकर्त्यांकडून प्रेरणा घ्यावी. यापुढेही सावंतवाडी मतदारसंघातील गावागावात भाजपा पक्ष वाढविण्यासाठी काम करा. सावंतवाडी तालुक्याला नेहमीच जिल्ह्यात नंबर वन ठेवा. पालकमंत्री म्हणून सर्व ताकद द्यायला मी तयार आहे, असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.



बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित भारतीय जनता पार्टी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या संघटनपर्व बैठकीला उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सावंतवाडीत जेव्हा जेव्हा कार्यकर्त्यांची परीक्षा घेतली गेली तेव्हा तेव्हा ते मेरिटमध्ये पास झाले. मात्र, आता जबाबदारी आम्हा नेत्यांची आहे. ज्या ज्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये प्रामाणिकपणे काम केले त्यांनाच यापुढील निवडणुकांमध्ये संधी दिली जाईल व पक्षाचे नेतृत्व हे प्रामाणिक कार्यकर्त्यांसोबतच राहील, असा विश्वास त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.
रवींद्र चव्हाण हे पालकमंत्री असताना त्यांनी पक्ष वाढीच्या दृष्टीने नेहमीच काम केले. मात्र, त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा अनेकांनी घेतला. पक्ष सोडताना त्यांच्याकडून घेतलेल्या निधीतून केलेली कामं आपणच केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे पुन्हा मागच्या चुका पुन्हा होता नये याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. अन्यथा, त्यांचा संयम राहणार नाही, असे त्यावेळी त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना सूचित केले.


आज पालकमंत्री भाजपचा आहे. त्यामुळे पहिलं प्राधान्य भाजपलाच आहे. जे महायुतीचे सरपंच नाहीत त्यांना निधी नाही. मला कोण त्याबद्दल विचारणारही नाही. पक्ष वाढवायचा अधिकार आम्हाला आहे. नवीन आर्थिक वर्षात सरपंचांची यादी मी घेऊन बसणार आहे. उबाठाला शुन्य टक्के निधी देणार हे निश्चित आहे, असा पुर्नउच्चार त्यांनी केला.

Comments
Add Comment

Mumbai Seaplane : मुंबई-रत्नागिरी सी-प्लेन सेवेला वेग; कोकण पर्यटनासाठी मोठे पाऊल

मुंबई : कोकणातील पर्यटनाला नवी चालना देण्यासाठी मुंबई (Mumbai) आणि रत्नागिरीदरम्यान (Ratnagiri) सी-प्लेन सेवा सुरू

Matsya Sampada Yojana : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत पोहोचवा; नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची (Matsya Sampada Yojana) प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील अधिकाधिक मच्छिमारांना

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण

Kokan Railway : प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद; 16 जुलैपासून इंटरसिटी, डेक्कन क्वीन पुन्हा रुळावर

रायगड : मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अतिरिक्त गाड्या

Dapoli Mahabaleshwar highway : दापोली–पोलादपूर–महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गासाठी प्रवीण दरेकरांची गडकरींकडे मागणी

मुंबई : दापोली–पोलादपूरमार्गे महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देण्याची मागणी भाजपचे गटनेते तथा आमदार