माध्यमांतर, ‘छावा’ आणि वाचनसंस्कृती...!

राज चिंचणकर


साहित्यविश्वात अनेक साहित्यकृती निर्माण होतात आणि वाचकवर्ग त्यांचे उत्साहात स्वागत करतात. काही साहित्यकृती तर 'माईलस्टोन' ठरतात. अनेकदा अशा गाजलेल्या साहित्यकृतींचे माध्यमांतरही होताना दिसते. आतापर्यंत विविध कथा, कादंबऱ्या या रंगभूमीवर; तसेच छोट्या व मोठ्या पडद्यावर माध्यमांतर होऊन अवतरल्या आहेत. रसिकही त्यांच्या आवडीच्या अशा साहित्यकृतींच्या माध्यमांतराचे स्वागत करत आले असून, या कलाकृतींना रंगभूमीवर किंवा पडद्यावर अनुभवणे ही रसिकांसाठी आनंदाची पर्वणी ठरलेली आहे. सध्या सर्वत्र एका मराठी साहित्यकृतीची मोठी चर्चा आहे आणि ती साहित्यकृती म्हणजे ज्येष्ठ साहित्यकार शिवाजी सावंत यांची 'छावा' ही कादंबरी...! सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित 'छावा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या सगळ्याचा एक वेगळा परिणामही होताना दिसत आहे आणि तो म्हणजे 'छावा' या कादंबरीला आता वाचकांकडून खूप मागणी वाढली आहे.


 

अनेक पुस्तकांच्या दुकानांमध्ये 'छावा' ही कादंबरी विकत घेण्यासाठी वाचकवर्ग पायधूळ झाडताना आढळत आहे. काही ठिकाणी तर ही कादंबरी दुकानातून गायब झाल्याचे चित्र आहे. असे असले तरी सद्यस्थितीत ही कादंबरी हमखास उपलब्ध होण्याचे ठिकाण म्हणजे विविध वाचनालये...! 'छावा' ही कादंबरी ऐंशीच्या दशकात जेव्हा प्रकाशित झाली, तेव्हापासूनच वाचकांनी तिचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. कालांतराने या कादंबरीच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या. ही कादंबरी 'माईलस्टोन' साहित्यकृती असल्याने बहुतेक सर्वच वाचनालयांत ती उपलब्ध आहे. सध्या 'छावा' या कादंबरीसाठी वाचकांकडून वाचनालयांकडे मोठी मागणी होताना दिसत आहे. अर्थातच, मागणी अधिक आणि पुरवठा कमी, या स्थितीमुळे वाचकांना ही कादंबरी आता हातात मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. एखाद्या साहित्यकृतीवर नव्याने निर्माण झालेल्या कलाकृतीमुळे, मूळ साहित्यकृतीवर कशाप्रकारे परिणाम होऊ शकतो, याचे उदाहरण सध्या 'छावा' या चित्रपटाच्या निमित्ताने स्पष्ट होत आहे. या संदर्भात माहीम सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल संदीप पेडणेकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणतात, ‘आमच्या वाचनालयात शिवाजी सावंत यांच्या 'छावा' या कादंबरीच्या प्रती अर्थातच आहेत आणि 'छावा' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या कादंबरीला युवा पिढीकडून मागणी वाढली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाची व पराक्रमाची उजळणी पुन्हा एकदा युवा पिढी यानिमित्ताने करत आहे आणि हे आपल्या इतिहासाचे वैभव आहे. अशा चित्रपटामुळे वाचनाची ओढ वाढली, हे वाचनसंस्कृती जपणाऱ्या आमच्यासारख्या वाचनालयासाठी महत्त्वाचे आहे’.

Comments
Add Comment

नाटकाच्या प्रयोगासाठी ‘उदकशांत’ करताना...

राजरंग : राज चिंचणकर नाटक हे नाटक असते आणि नाटकांच्या बाबतीत व्यावसायिक व प्रायोगिक असा भेदभाव केला जाऊ नये, अशी

‘गोदावरी’तील समावेश कलाटणी देणारा

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल गौरी नलावडे या अभिनेत्रीचा ‘वडा पाव’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. गौरीचे शालेय

कलात्मक दिग्दर्शक गुरुदत्त

गुरुदत्त हिंदी चित्रपटसृष्टीत जिवंतपणीच आख्यायिका बनलेले व्यक्तिमत्त्व. आजही गुरुदत्त यांचे नाव घेतले की

नाईलाजांच्या प्रदेशातील तीन डिसेबल्स

पाचवा वेद : भालचंद्र कुबल यालेखाचं शीर्षक मुद्दामहून हेच ठेवण्यामागचं कारण असं की परीक्षक म्हणून एकदा का तुम्ही

नाईलाजाच्या प्रदेशातील तीन डिसेबल्स

भालचंद्र कुबल यंदाच्या आय. एन. टी. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला पन्नास वर्षे पूर्ण झाली. मी या स्पर्धेत

मराठी रंगभूमीचा एकमेव ‘सूत्रधार’...

रंगभूमीवर नाटकांचे सूत्रधार अनेक असतात, पण मराठी रंगभूमीला एखादा सूत्रधार असू शकतो का; या प्रश्नाचे उत्तर आता