Thane News : कुदळीने मारहाण करून महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षांची सक्त मजुरी

ठाणे : महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्त मजुरीचे शिक्षा ठोठावली आहे. विक्रमगड तालुक्यातील कासा गावात हा गुन्हा घडला होता. सहा वर्षानंतर कुणाचा अंतिम निकाल लागला. शिक्षा ठोठावण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव शहाबाज मन्सूर शेख असे आहे. विक्रमगड तालुक्यातील कासा गावाच्या नजीक असलेल्या शेतामधील झोपड्या मध्ये ४७ वर्षीय महिला तिच्या मुलीसोबत राहते. याचा गैरफायदा घेत शहाबाज मन्सूर शेख, वय ३२ वर्षे नामक आरोपीने घरात घुसून लोखंडी कुदळीने मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला होता. बलात्काराचा प्रतिकार म्हणून पीडित महिलेने आरोपीच्या ओठाला चावा घेतला होता.



त्यामुळे आरोपीने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्याची अंतिम सुनावणी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन के कारंडे यांच्यासमोर गुरुवारी झाली. सरकारी वकील विजय मुंढे यांनी न्यायालयासमोर १४ साक्षीदार तपासून भक्कम साक्षी, पुरावा सादर करत जोरदार युक्तिवाद केला. त्यावर न्यायाधीशाने शेख याला बलात्काराचा गुन्हा दहा वर्षे सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये, जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नात दोन वर्षे सत्ता मजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

Comments
Add Comment

‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ची स्टार कास्ट ‘कौन बनेगा करोड़पति’च्या सेटवर

मुंबई : आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी मनोरंजक चित्रपट हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस आपल्या खास ऊर्जा आणि खुमासदार

सरत्या वर्षाला द्या निरोप , प्रियजनांना द्या २०२६ नववर्षाच्या हटके शुभेच्छा!

आज संपूर्ण जगभरात मध्यरात्री सर्वजण सरत्या वर्षाला निरोप दिला जातो. २०२६ नवीन वर्षाचे स्वागत केले जाईल. सरत्या

‘हॅप्पी न्यू इयर’चा एक मेसेज करू शकतो बँक खाते रिकामे

सफाळे पोलिसांकडून सायबर स्कॅमबाबत हाय अलर्ट सफाळे : नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र असतानाच, सायबर

भाजप जिल्हाध्यक्षांसह मंडळ अध्यक्षांना संधी

संघटनातील अनेक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता

आज मध्यरात्री उशिरापर्यंत धावणार 'मेट्रो १'

मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या

१ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती