Thane News : कुदळीने मारहाण करून महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षांची सक्त मजुरी

ठाणे : महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्त मजुरीचे शिक्षा ठोठावली आहे. विक्रमगड तालुक्यातील कासा गावात हा गुन्हा घडला होता. सहा वर्षानंतर कुणाचा अंतिम निकाल लागला. शिक्षा ठोठावण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव शहाबाज मन्सूर शेख असे आहे. विक्रमगड तालुक्यातील कासा गावाच्या नजीक असलेल्या शेतामधील झोपड्या मध्ये ४७ वर्षीय महिला तिच्या मुलीसोबत राहते. याचा गैरफायदा घेत शहाबाज मन्सूर शेख, वय ३२ वर्षे नामक आरोपीने घरात घुसून लोखंडी कुदळीने मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला होता. बलात्काराचा प्रतिकार म्हणून पीडित महिलेने आरोपीच्या ओठाला चावा घेतला होता.



त्यामुळे आरोपीने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्याची अंतिम सुनावणी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन के कारंडे यांच्यासमोर गुरुवारी झाली. सरकारी वकील विजय मुंढे यांनी न्यायालयासमोर १४ साक्षीदार तपासून भक्कम साक्षी, पुरावा सादर करत जोरदार युक्तिवाद केला. त्यावर न्यायाधीशाने शेख याला बलात्काराचा गुन्हा दहा वर्षे सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये, जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नात दोन वर्षे सत्ता मजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

Comments
Add Comment

वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी १० पट जास्त शुल्क

ट्रकपासून बाईकपर्यंत २,५०० वरून थेट २५,००० रुपये नवी दिल्ली : केंद्र सरकारने रस्ते वाहतूक आणि महामार्ग

रशिया भारताला एसयू - ५७ लढाऊ विमाने देणार

मॉस्को : रशियाने भारताला एसयू-५७ स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्यास सहमती दर्शवली आहे. रशियन कंपनी रोस्टेकचे सीईओ

पाणी भरण्याच्या वादातून तोंडावर 'स्प्रे' मारलेल्या व्यक्तीचे निधन

विरार  : पाणी भरण्याच्या क्षुल्लक वादातून एका महिलेने आपल्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मच्छर

गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य

म्हाडाच्या विकासकांना १०० टक्के मालमत्ता कर माफ' मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने

मुंबईतील १२ मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सुरू

मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट

पाकिस्तानवरील हवाईक्षेत्र रोखले गेल्याने एअर इंडिया आर्थिक अडचणीत

पहलगाम घटनेनंतर संबंध विकोपाला गेल्याचा फटका नवी दिल्ली  :  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे