City Killer : मुंबईवर 'सिटी किलर'चा धोका! नासाने दिला इशारा

मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक मोठी धोक्याची घंटा वाजली आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था 'नासा' (NASA) ने एका विशालकाय 'एस्टेरॉयड' (asteroid) विषयी इशारा दिला आहे, जो मुंबईसाठी अत्यंत घातक ठरू शकतो. या एस्टेरॉयडला 'सिटी किलर' (City Killer) असे संबोधले जात असून, त्याचे नाव 'वायआर४' (YR4) आहे.



मुंबईवर एस्टेरॉयडचा धोका?


नासाच्या अंदाजानुसार २२ डिसेंबर २०३२ रोजी वायआर४ हा एस्टेरॉयड पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. त्याच्या पृथ्वीला धडकण्याची १.५ टक्के शक्यता वर्तवली जात आहे, जी खूपच चिंताजनक आहे. जर हा एस्टेरॉयड मुंबईला धडकला, तर संपूर्ण शहराचा नाश होण्याची शक्यता असून २ कोटींहून अधिक लोकांचे जीवन धोक्यात येऊ शकते.



नासाची बारकाईने नजर


हा एस्टेरॉयड १३० ते ३०० फूट व्यासाचा असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. जर तो पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना तुटला, तरीदेखील एक महाविनाशकारी स्फोट होऊ शकतो, ज्याचा फटका संपूर्ण मुंबईला बसू शकतो. त्यामुळे नासा आणि अन्य जागतिक अंतराळ संस्था यावर सतत लक्ष ठेवून आहेत.



फक्त मुंबईच नाही, हे क्षेत्रसुद्धा धोक्यात!


नासाच्या अंदाजानुसार, फक्त मुंबईच नाही तर दक्षिण आशिया, पूर्वी प्रशांत महासागर, बोगोटा (कोलंबिया) आणि लागोस (नायजेरिया) यांसारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या शहरांनाही धोका निर्माण झाला आहे.





काय होऊ शकते परिणाम?



  • भयंकर स्फोट, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस

  • महाकाय लाटांचा (सुनामी) धोका

  • वायू आणि हवामानावर परिणाम, ज्यामुळे पृथ्वीवर तापमान बदलू शकतो



मुंबईकरांनी काय करावे?


तत्काळ घाबरून जाण्याची गरज नाही, मात्र भारत सरकार आणि वैज्ञानिक संस्थांनी याकडे (City Killer) गंभीर लक्ष द्यावे लागेल. नासा आणि अन्य तज्ज्ञ वायआर४ चे हालचाल निरीक्षण करत आहेत आणि भविष्यात त्याला पृथ्वीपासून दूर ढकलण्यासाठी उपाययोजना केली जाऊ शकते. त्यामुळे मुंबईकरांनी सरकारी सूचनांचे पालन करणे आणि अधिकृत घोषणांची वाट पाहणे महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला

महाराष्ट्रात मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार कारवाई - शिक्षण मंत्री दादाजी भुसे

सर्व माध्यमे, सर्व भाषिक आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी बंधनकारक मुंबई : "महाराष्ट्रातील सर्व

बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र कोकणात करा; आमदार प्रवीण दरेकरांची सरकारकडे मागणी

मुंबई : हिंगोली येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या धर्तीवर कोकणातही या केंद्राचे उपकेंद्र स्थापन