City Killer : मुंबईवर 'सिटी किलर'चा धोका! नासाने दिला इशारा

मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक मोठी धोक्याची घंटा वाजली आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था 'नासा' (NASA) ने एका विशालकाय 'एस्टेरॉयड' (asteroid) विषयी इशारा दिला आहे, जो मुंबईसाठी अत्यंत घातक ठरू शकतो. या एस्टेरॉयडला 'सिटी किलर' (City Killer) असे संबोधले जात असून, त्याचे नाव 'वायआर४' (YR4) आहे.



मुंबईवर एस्टेरॉयडचा धोका?


नासाच्या अंदाजानुसार २२ डिसेंबर २०३२ रोजी वायआर४ हा एस्टेरॉयड पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. त्याच्या पृथ्वीला धडकण्याची १.५ टक्के शक्यता वर्तवली जात आहे, जी खूपच चिंताजनक आहे. जर हा एस्टेरॉयड मुंबईला धडकला, तर संपूर्ण शहराचा नाश होण्याची शक्यता असून २ कोटींहून अधिक लोकांचे जीवन धोक्यात येऊ शकते.



नासाची बारकाईने नजर


हा एस्टेरॉयड १३० ते ३०० फूट व्यासाचा असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. जर तो पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना तुटला, तरीदेखील एक महाविनाशकारी स्फोट होऊ शकतो, ज्याचा फटका संपूर्ण मुंबईला बसू शकतो. त्यामुळे नासा आणि अन्य जागतिक अंतराळ संस्था यावर सतत लक्ष ठेवून आहेत.



फक्त मुंबईच नाही, हे क्षेत्रसुद्धा धोक्यात!


नासाच्या अंदाजानुसार, फक्त मुंबईच नाही तर दक्षिण आशिया, पूर्वी प्रशांत महासागर, बोगोटा (कोलंबिया) आणि लागोस (नायजेरिया) यांसारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या शहरांनाही धोका निर्माण झाला आहे.





काय होऊ शकते परिणाम?



  • भयंकर स्फोट, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस

  • महाकाय लाटांचा (सुनामी) धोका

  • वायू आणि हवामानावर परिणाम, ज्यामुळे पृथ्वीवर तापमान बदलू शकतो



मुंबईकरांनी काय करावे?


तत्काळ घाबरून जाण्याची गरज नाही, मात्र भारत सरकार आणि वैज्ञानिक संस्थांनी याकडे (City Killer) गंभीर लक्ष द्यावे लागेल. नासा आणि अन्य तज्ज्ञ वायआर४ चे हालचाल निरीक्षण करत आहेत आणि भविष्यात त्याला पृथ्वीपासून दूर ढकलण्यासाठी उपाययोजना केली जाऊ शकते. त्यामुळे मुंबईकरांनी सरकारी सूचनांचे पालन करणे आणि अधिकृत घोषणांची वाट पाहणे महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण