‘मराठी माणसाने अटकेपार झेंडा फडकवला’: शरद पवार

नवी दिल्ली : ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन शुक्रवारी पार पडलं. शरद पवार हे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. ‘केवळ महाराष्ट्र नाही तर मराठी माणसाने अटकेपार झेंडा फडकवला आहे. नोकरी कामाच्या निमित्ताने अनेक लोक देशाच्या कानाकोपऱ्यात दिसतात. मराठी साहित्याचा अद्भूत अनुभव घेण्यासाठी आपण इथे जमलो याचा मला मनापासून आनंद आहे’, अशा शब्दात शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


याच भाषणात पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला. नरेंद्र मोदी यांना संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी आपण गेलो तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपण कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचं आश्वासन दिलं, असं शरद पवार यांनी सांगितलं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीत दुसऱ्यांदा होत आहे. या सारस्वतांच्या महामेळाव्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहिले याचा मला मनापासून आनंद आहे, असेही ही पवार यावेळी म्हणाले.



दरम्यान, अखिल साहित्य संमेलनात पंतप्रधान मोदींच्या हस्ते दीप प्रज्वलन केलं जाणार होतं. यावेळी मोदींनी शरद पवारांना पुढे बोलवून त्यांचा हात धरून दीप प्रज्वलन केलं. त्यानंतर दोन्ही नेते व्यासपीठावर शेजारी बसले, यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. तर पवार यांचं भाषण संपल्यानंतर ते पुन्हा आपल्याजागी बसण्यासाठी परतले. यावेळी पवारांना बसण्यासाठी पंतप्रधान मोदींनी खुर्ची पुढे केली. त्यानंतर टेबलावरील बॉटलमधील पाणी ग्लासात ओतून पवारांना पाणी पिण्यासाठी ग्लास पुढे केला, या कृतीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या.

Comments
Add Comment

बीसीसीआयचा एसीसीवर दबाव, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावरून कारवाईचा इशारा

नवी दिल्ली : आशिया कप २०२५ नंतर विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी देण्यात आली नाही. ही ट्रॉफी मिळाली नाही तर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा

दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचं देशवासियांना भावनिक पत्र

नवी दिल्ली : दिवाळीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या

१० कोटींच्या चिनी फटाक्यांची तस्करी : डीआरआयच्या ऑपरेशन फायर ट्रेलची मोठी कारवाई

नवी दिल्ली: भारताच्या सीमांवरून चिनी फटाक्यांची बेकायदेशीर आयात करण्याचा मोठा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने

नागा अतिरेक्यांवर ड्रोन स्ट्राईक ? भारतविरोधी पी. आंग माई ठार ?

नायपिदाव : भारत-म्यानमार सीमेवर बंडखोरांच्या हालचाली वाढू लागल्यामुळे तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर २०