‘मराठी माणसाने अटकेपार झेंडा फडकवला’: शरद पवार

नवी दिल्ली : ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन शुक्रवारी पार पडलं. शरद पवार हे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. ‘केवळ महाराष्ट्र नाही तर मराठी माणसाने अटकेपार झेंडा फडकवला आहे. नोकरी कामाच्या निमित्ताने अनेक लोक देशाच्या कानाकोपऱ्यात दिसतात. मराठी साहित्याचा अद्भूत अनुभव घेण्यासाठी आपण इथे जमलो याचा मला मनापासून आनंद आहे’, अशा शब्दात शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


याच भाषणात पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला. नरेंद्र मोदी यांना संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी आपण गेलो तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपण कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचं आश्वासन दिलं, असं शरद पवार यांनी सांगितलं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीत दुसऱ्यांदा होत आहे. या सारस्वतांच्या महामेळाव्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहिले याचा मला मनापासून आनंद आहे, असेही ही पवार यावेळी म्हणाले.



दरम्यान, अखिल साहित्य संमेलनात पंतप्रधान मोदींच्या हस्ते दीप प्रज्वलन केलं जाणार होतं. यावेळी मोदींनी शरद पवारांना पुढे बोलवून त्यांचा हात धरून दीप प्रज्वलन केलं. त्यानंतर दोन्ही नेते व्यासपीठावर शेजारी बसले, यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. तर पवार यांचं भाषण संपल्यानंतर ते पुन्हा आपल्याजागी बसण्यासाठी परतले. यावेळी पवारांना बसण्यासाठी पंतप्रधान मोदींनी खुर्ची पुढे केली. त्यानंतर टेबलावरील बॉटलमधील पाणी ग्लासात ओतून पवारांना पाणी पिण्यासाठी ग्लास पुढे केला, या कृतीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे