मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पनवेल ते पळस्पे फाटा दौरा


मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाची प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री पनवेल येथील पळस्पे फाटा येथे गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता येणार असल्याने पहाटेपासून रस्त्यांच्या दुभाजक पाण्याने स्वच्छ करण्याचे काम सरकारी यंत्रणेने हाती घेतले होते. मंत्र्यांना पाहणी दौऱ्यात महामार्ग चकाचक दिसण्यासाठीची सरकारी यंत्रणेची लगीनघाई सुरू होती.

परंतू या दौऱ्याच्या सुरुवातीला मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने नेमकी महामार्गाची सद्यस्थिती काय आहे याची पाहणी करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्री भोसले हे गुरुवारी दिवसभर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून मुंबई-गोवा महामार्गाचे काम नेमके का रखडले याची माहिती घेणार आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम आजही अपुर्णावस्थेत आहे. मागील वर्षी गणेशोत्सवापूर्वी तत्कालिन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी कोणत्याही स्थितीमध्ये महामार्गाचे पुर्ण केले जाईल असा दावा केला होता. परंतू अनेक ठिकाणी महामार्गाचे काम सुरु आहे. तर अनेक ठिकाणी भूसंपादनाच्या प्रश्नामुळे काही मीटरचे काम ठप्प आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पळस्पे फाटा (पनवेल) ते हातखांबा (रत्नागिरी) या २८१ किलोमीटरच्या पल्यामधील कामाची पाहणी करणार आहेत.

ठिकठिकाणी महामार्गावर काम सुरु असल्याने अचानक वळसा मार्ग असल्याने आणि त्याचठिकाणी पथदिव्यांची सोय नसल्याने रात्रीच्यावेळी अपघात होत असल्याने हा महामार्ग धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या दोन्ही विभागांकडून मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू असले तरी अपघातानंतर येथे रुग्णवाहिका आणि ट्रामा सेंटर असलेल्या सरकारी रुग्णालयाची सोय नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

रखडलेले काम लवकर होणार पूर्ण


मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी केली आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कोकणवासीयांना या अपूर्ण रस्त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, या महामार्गाचे काम लवकर पुर्ण होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या विभागांतील अधिकाऱ्यांनी समन्वय साधून काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देऊ असे ते म्हणाले.
Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य